---Advertisement---

शाहिद अफरीदीने भारतीय सैन्यावर केली टीका; शिखर धवन भडकला, म्हणाला – कारगिल विसरलात का?

On: मंगळवार, एप्रिल 29, 2025 11:26 AM
---Advertisement---

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत संतापला आहे. या घटनेत 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे यात शंका नाही, परंतु तेथील माजी क्रिकेटपटू हे मान्य करण्यास तयार नाहीत. शाहिद आफ्रिदीसारखा माजी खेळाडू भारताकडून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा मागत आहेत.

माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने शाहिद आफ्रिदीच्या पुरावे मागण्याच्या विधानावर आता टीका केली आहे. शिखर धवनने त्याच्या ‘एक्स’ हँडलवर ट्विट केले आहे की, ‘कारगिलमध्येही तुमचा पराभव झाला होता, तुम्ही आधीच पातळी सोडली आहे, आणखी किती वाईट दृष्टीकोन घेत आहात, अनावश्यक विधाने करण्याऐवजी देशाच्या उन्नतीसाठी काही सकारात्मक करा. आम्हाला आमच्या भारतीय लष्कराचा अत्यंत अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!”

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया आली. या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी आफ्रिदीने भारतीय सैन्याला जबाबदार धरले आहे. त्याने पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावेही मागितले आणि घटनेच्या मीडिया कव्हरेजवर टीका केली. इतकेच नाही तर पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करणाऱ्या काही माजी भारतीय क्रिकेटपटूंनाही आफ्रिदीने लक्ष्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---