ऑस्ट्रेलियात पुरूषांचा आठवा टी20 विश्वचषक सुरू आहे. यामध्ये भारताच्या संघात राखीव खेळाडू म्हणून ज्याला संघात घेतले होते त्याने देशांतर्गत टी20 क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. सईद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) 2022च्या स्पर्धेत विदर्भ विरुद्ध मुंबई यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना गुरूवारी (3 नोव्हेंबर) खेळण्यात आला. या सामन्यात श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने विदर्भावर 5 विकेट्सने विजय मिळवला. यामुळे त्यांनी अंतिम फेरी गाठली. त्याचबरोबर मुंबई या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे.
हा सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर खेळवण्यात आला. या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जीतेश शर्मा याने 24 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. यामुळे विदर्भाने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 164 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने कर्णधार अजिंक्य रहाणे याची विकेट लवकरच गमावली. त्याला 5 धावांवर असताना दर्शन नलकंडे याने त्रिफळाचीत केले. यशस्वी जायसवाल देखील 12 धावा करत तंबूत परतला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आलेल्या श्रेयस अय्यर याने महत्वपूर्ण खेळी केली.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1588174595487830016?s=20&t=Kf3UD4jUEM-DHHgT7mLcGA
अय्यरला टी20 विश्वचषकात सुरूवातीला राखीव खेळाडू म्हणून निवडले गेले, नंतर मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे निराश न होता त्याने मुंबईकडून उल्लेखनीय कामगिरी सुरूच ठेवली. या सामन्यात त्याने 44 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकांराच्या सहाय्याने 73 धावा केल्या.
त्याचबरोबर सरफराज खान यानेही 19 चेंडूत 2 चौकार आणि एक षटकार मारत 27 धावा केल्या. तर शिवम दुबे हा 13 धावा करत नाबाद राहिला. यामुळे मुंबईने 16.5 षटकातच लक्ष्य पूर्ण केले. मुंबईकडून गोलंदाजी शम्स मुलाणी पुन्हा एकदा चमकला. त्याने 4 षटकात 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1588183018161680384?s=20&t=Kf3UD4jUEM-DHHgT7mLcGA
अंतिम फेरीत मुंबई 5 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशशी भिडणार आहे. रिषी धवन याच्या नेतृत्वाखालील हिमाचल प्रदेशने पहिल्या उपांत्य फेरीमध्ये पंजाबचा अवघ्य 13 धावांनी पराभव केला. या सामन्यात 176 या लक्ष्याचा पाठलाग करताना पुन्हा एकदा शुबमन गिल याने उत्तम खेळी केली. त्याने 32 चेंडूत 45 धावा केल्या. रमनदीप सिंग याने 15 चेंंडूत 29 धावा केल्या, मात्र त्या कमी पडल्या आणि पंजाबने सामना गमावला. तसेच कर्णधार मनदीप सिंग 15 चेंंडूत 29 धावा करत नाबाद राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुणेरी पलटणचा कर्णधार फझेल अत्राचलीने मानले चाहत्यांचे आभार! म्हणाला,’ आम्हाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर…’
जेव्हा राहुल द्रविडचा टी२०त पाहायला मिळाला होता ‘रुद्रावतार’, मारले होते सलग ३ गगनचुंबी षटकार