येत्या ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यात ५ टी२० सामने खेळवले जाणार आहे. या मालिकेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिल्याने अनेक वादविवाद सुरू झाले आहेत. मात्र, या वादविवादांमध्ये आता भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर संघात विराट कोहलीची जागा घेण्यास सज्ज झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी श्रेयस अय्यर (Shreyas Iyyer) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल अशी शक्यता आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेतही त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. या मालिकेत विराट कोहलीही संघाचा भाग नव्हता आणि श्रेयस अय्यरने याचा फायदा घेतला आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २०४ धावा केल्या. त्याच्या या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर त्याला मालिकावीराचा बहुमानही मिळाला. याशिवाय, आयपीएल २०२०मध्ये, कोलकाताचे कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरने १४ सामन्यात ३०.८५ च्या सरासरीने फलंदाजी करताना ४०१ धावा केल्या, त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळए सध्याचा फॉर्म लक्षात घेता श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणयास सज्ज आहे.
श्रेयसने गेल्या काही कालावधीमध्ये आपल्या खेळाच्या शैलीत खूप सारे बदल केले आहेत. त्याने त्याच्या फलंदाजीमध्ये आक्रमकता आणली आहे. सोबतचं कठीण परिस्थितीत त्याने संघाला सांभाळत धैऱ्याचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी गरजेचे असणारे धैर्य आणि वेळप्रसंगी आक्रमकता या दोन्ही गोष्टी श्रेयसकडे आहेत. त्यामुळए आता विराट कोहलीच्या गैरहजेरीत श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत संघाच्या विजयात योगदान देऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीचा भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! भारताची दिग्गज क्रिकेटर मिताली राजचा क्रिकेटला गुडबाय
धोनीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या हेडनला ‘ती’ बॅट वापरण्यास केलेला विरोध, काय होती त्या बॅटची खासियत?
ऑस्ट्रेलियाने १५ वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती, श्रीलंकेवर केली १० गडी राखत मात