India vs England 4th Test Draw: 23 ते 27 जुलै दरम्यान मँचेस्टरच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला गेला. सामना पाचव्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत चालला. मात्र, सामन्याचा निकाल लागला नाही. भारताने पहिल्या डावात खराब फलंदाजी केली होती, त्यामुळे असे वाटत होते की भारतीय संघ हा सामना एका डावाने हरेल. परंतु दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत इंग्लंडच्या हातून विजय हिसकावून घेतला. सामन्यानंतर कर्णधार शुबमन गिलचे मोठे विधान समोर आले आहे. (Manchester Test Draw)
सामन्यानंतर गिल म्हणाला की, “फलंदाजीच्या प्रयत्नाने मी खूप आनंदी आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्यावर जबरदस्त दबाव होता. आता फक्त विकेट घेणे हेच सर्व काही आहे. पाचव्या दिवसाची विकेट, काहीतरी घडत आहे, प्रत्येक चेंडू एक प्रकारचा इव्हेंट आहे. आम्हाला चेंडूगणिक खेळ शक्य तितका पुढे न्यायचा होता आणि आम्ही याचबद्दल बोललो. आशा आहे की आम्ही पुढील सामना जिंकू आणि मालिका ड्रॉ करू.” (Shubman Gill Statement)
तो पुढे म्हणाला, “खरं सांगायचं तर, तुम्ही आधी किती धावा केल्या आहेत, याने काही फरक पडत नाही. जेव्हाही तुम्ही देशाची पांढरी जर्सी घालून मैदानात उतरता, तेव्हा थोडी घबराहट होते. यातून हे कळते की मला देशासाठी खेळण्याची किती काळजी आहे आणि मला या खेळावर किती प्रेम आहे.” (Shubman Gill Statement)






