13 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेेेेेेच्या सहाव्या दिवशी शनिवारी भारताने पदकतालिकेवर वर्चस्व राखले. जलतरणपटू आणि कुस्तीपटूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारताने सुवर्णपदकाच्या शतकांसह पदकांचा 200 चा आकडा पार केला.
शनिवारी भारतीय खेळाडूंनी 29 सुवर्ण पदाकासह एकूण 49 पदकांची नोंद केली. त्यामुळे भारताने यजमान नेपाळला पदकदालिकेत खूप मागे टाकले आहे.
110 सुवर्ण, 69 रौप्य आणि 35 कांस्य अशा एकूण 214 पदकांसह पदकतालिकेमध्ये भारताने अव्वल स्थान मिळवले. नेपाळ 142 पदकांसह (43 सुवर्ण, 34 रौप्य व 65 कांस्य) दुसर्या क्रमांकावर आहे. श्रीलंका 30 सुवर्ण, 57 रौप्य आणि 83 कांस्यपदकांसह एकूण 170 पदकांसह तिसर्या स्थानावर आहे.
शनिवारी जलतरणपटूंनी भारताला 7 सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवून दिले. श्रीहरी नटराज (100 मीटर बॅकस्ट्रोक), ऋचा मिश्रा (800 मीटर फ्री स्टाईल), शिवा एस (400 मीटर मेडले), माना पटेल (100 मीटर बॅकस्ट्रोक), चाहत अरोरा (50 मीटर बॅकस्ट्रोक), लिकीथ एसपी (50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक) आणि रुजुता भट्ट (50 मीटर फ्री स्टाईल) यांनी प्रथम स्थान पटकावले.
एक व्ही जयवीना (50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक) आणि रिद्धिमा वीरेंद्रकुमार (100 मीटर बॅकस्ट्रोक) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. यामुळे जलतरण स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या 30 वर पोहोचली. पहिल्या दोन दिवस जलतरणपटूंनी एकूण 21 पदके जिंकली.
सुरुवातीच्या दिवशी चार सुवर्णपदके जिंकत भारतीय कुस्तीगीरांनीही स्पर्धेला शानदार सुरुवात केली. सत्यव्रत कादियन (पुरुष 97 किलो फ्री स्टाईल), सुमित मलिक (पुरुष 125 किलो फ्री स्टाईल), गुरश्रीप्रीत कौर (महिला 76 किलो) आणि सरिता मोरे (महिला 57 किलो) यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले.
राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता कादियनने पाकिस्तानी प्रतिस्पर्धी तबियन खानला पराभूत केले. तर राष्ट्रीय चॅम्पियन गुरनप्रीतने सात वर्षानंतर पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले.
भारतीय खेळाडूंनी नेमबाजीमध्ये ही चांगले प्रदर्शन करत करत तीन सुवर्णपदके जिंकली. अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर जलद फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकल्यानंतर भावेश शेखावत व आदर्श सिंग यांच्यासह पुरुषांच्या संघिक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. मेहूली घोष आणि यश वर्धन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत दिवसाचे तिसरे सुवर्णपदक जिंकले.
वेटलिफ्टर्सने शनिवारी दोन सुवर्ण पदकाची भर घातली असून वेटलिफिटिंगमध्ये एकूण पदकांची संख्या 10 (9 सुवर्ण, एक रौप्य) झाली. 81 किलोग्रॅम वजन गटात 190 वजन उचलून भारताच्या शरस्तसिंगने प्रथम क्रमांक मिळविला. तर अनुराधाने 86 किलो गटात 200 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.
ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारताने शनिवारी 8 पदके जिंकली, यात कोणत्याही सुवर्ण पदकाचा समावेश नव्हता. भारताच्या रश्पाल सिंग (पुरुषांची मॅरेथॉन), महंमद अफझल (पुरुष 800 मीटर), शिवपाल सिंग (पुरुष भाला फेक) आणि पुरुष 4×400 मीटर रिले संघाने प्रत्येकी एक रौप्यपदक जिंकले.
तसेच शेरसिंग (पुरुष मॅरेथॉन), ज्योती गावटे (महिला मॅरेथॉन), शर्मिला कुमारी (महिला भाला फेक) यांनी आणि महिला 4×400 मीटर रिले शर्यतीत भारतीय संघाने कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे भारताने ऐथलेटिक्स स्पर्धेचे समापन 47 पदकांसह (12 सुवर्ण, 20 रौप्य आणि 15 कांस्य) केला.
स्क्वॅशमध्ये 3 भारतीयांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सुनयना कुरुविला आणि तन्वी खन्ना यांचा सामना होईल, तर हरिंदर पाल सिंधूने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
हैदराबाद टी२०आधी मोहम्मद अझरुद्दीन यांचा झाला असा मोठा सन्मान
वाचा- ????https://t.co/BdfPbSctT2????#म #मराठी #INDvWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiBrain— Maha Sports (@Maha_Sports) December 7, 2019
नोटबूक सेलिब्रेशनबद्दल कर्णधार विराट कोहलीचा मोठा खूलासा; म्हणाला…
वाचा????https://t.co/CUZxMkvY6r????#म #मराठी #INDvWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiBrain #TeamIndia #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) December 7, 2019