---Advertisement---

अश्विनने 140 कोटी भारतीयांना सांगितली गंभीरची सत्यता; म्हणाला, ‘त्याने 2011च्या विश्वचषकात…’

R-Ashwin-And-Gautam-Gambhir
---Advertisement---

भारतीय संघाने 2007चा टी20 विश्वचषक आणि 2011चा वनडे विश्वचषक जिंकला होता. या दोन्ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू गौतम गंभीर याने मोठ्या खेळी साकारल्या होत्या. त्यामुळे भारत या विश्वचषकांचा किताब आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरला होता. सोशल मीडियावरही अनेकदा अशा चर्चा रंगतात की, या दोन्ही विश्वचषक जिंकण्यात गंभीरने जेवढे योगदान दिले, त्याचे तितके श्रेय त्याला मिळत नाही. आता हीच गोष्ट आर अश्विन याने बोलून दाखवली आहे.

काय म्हणाला अश्विन?
सन 2011मधील विश्वविजेता आणि आता विश्वचषक 2023 (World Cup 2023) संघात अचानक सामील झालेल्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्याविषयी भाष्य केले. त्याने क्रिकेट समालोचक आणि जाणकार हर्षा भोगले यांच्या एका शोमध्ये गंभीरविषयी बोलताना म्हटले, “मला वाटते की, गौतम गंभीर भारतातील सर्वात चुकीचा समजला जाणारा क्रिकेटपटू आहे. कारण, आपल्या देशात कोणत्याही व्यक्तीसाठी आधीपासूनच एक धारणा बनलेली असते. तो संघाचा एक महान खेळाडू आहे. तो संघाला विजय मिळवून देण्यात आणि संघासाठी नेहमी संघर्ष करणारा एक महान खेळाडू आहे. तो एक चांगला व्यक्तीही आहे. असे होऊ शकते की, तो आपल्या चेहऱ्यामार्फत अधिक गोष्टी दाखवत नसेल, पण त्याला मैदानावर जाऊन नेहमी सामन्यात लढणे आणि विजय मिळवणे माहिती होते. तो फक्त फिरकीचा चांगला खेळाडू नव्हता, तर खेळाविषयीही गोष्टी हेरून घ्यायचा.”

पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, “फक्त त्या एका (विश्वचषक अंतिम सामन्याची) गोष्ट नाहीये. तो त्यापूर्वीही अनेक शानदार खेळी साकारून अंतिम सामन्यात पोहोचला होता. त्यात तो एक अनसंग हिरो म्हणून उदयास आला होता.”

अश्विन असेही म्हणाला की, “त्या खास खेळीबद्दल बोलायचं झालं, तर आमचे 2 विकेट्स पडले होते. विराट तिलकरत्ने दिलशानच्या चेंडूवर बाद झाला होता. तिथून गौतमने खरंच आम्हाला जराही दबाव जाणवू दिला नाही. ज्याप्रकारे त्याने फटकेबाजी केली, खेळपट्टीवर धावला, ज्याप्रकारे जोखीम घेतली, ते सर्व निस्वार्थ होते. कदाचित तो 120 किंवा 130 धावांची नाबाद खेळी खेळूनही येऊ शकत होता. मात्र, त्याने एकदम निस्वार्थ खेळी साकारली. माझ्या मनात गौतमसाठी खूप जास्त आदर आहे. मला वाटते की, त्याला जितके श्रेय मिळायला पाहिजे होते, लोक त्याला त्याहून खूपच कमी श्रेय देतात.”

गौतम गंभीरची कारकीर्द
गौतम गंभीर याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून 58 कसोटी सामने, 147 वनडे सामने आणि 37 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 41.96च्या सरासरीने 4154 धावा, वनडेत 39.68च्या सरासरीने 5238 धावा आणि टी20त  27.41च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 9 शतके आणि 1 द्विशतक आहे. तसेच, वनडेत त्याच्या नावावर 11 शतकांचा समावेश आहे. (spinner ravichandran ashwin praised gautam gambhir said misunderstood cricketer of india)

हेही वाचा-
विश्वचषकापूर्वी रोहितचे विधान चर्चेत; म्हणाला, ‘मला आणि खेळाडूंना माहितीये…’
ENG vs NZ : कधी, कुठे आणि कसा पाहता येईल World Cup उद्घाटनाचा सामना? सर्व माहिती एकाच क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---