विश्वचषक 2023 स्पर्धेत श्रीलंका संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलग दुसऱ्या सामन्यात त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. आधी दक्षिण आफ्रिका संघाकडून दारुण पराभव झाला आणि आता पाकिस्तान संघाविरुद्धही लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. अशात संघाचा कर्णधार दसून शनाका याने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या संघाला पराभव का पत्करावा लागला. त्याने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यातील पराभवाचे कारण धावा कमी पडल्याचे सांगत संघाला चेतावणीही दिली.
काय म्हणाला शनाका?
दसून शनाका (Dasun Shanaka) याने सामन्यानंतर मोठे विधान केले. तो म्हणाला, “कुसल मेंडिस वेगळ्याच झोनमध्ये आहे, त्याने सराव सत्रात अविश्वसनीय खेळी साकारली, पहिल्या सामन्यात 70हून अधिक धावा केल्या आणि इथे शानदार शतक झळकावले. अजूनही धावा येणार आहेत. सदीरा वास्तवात चांगला खेळत आहे. आम्ही आणखी थोड्या मजबूतीसह डावाची समाप्ती करायला पाहिजे होती. या खेळपट्टीवर आम्हाला 20-25 धावा कमी पडल्या. त्यांना श्रेय जाते. ते वास्तवात चांगल्या कमी गतीने चेंडू टाकत होते. मी त्यांच्याकडून (गोलंदाज) जास्त काही मागू शकत नाही. आम्ही त्यांना सोप्या योजना दिल्या आहेत.”
संघाच्या सर्वात मोठ्या चिंतेविषयी बोलताना तो म्हणाला, “आम्हाला अतिरिक्त धावांबद्दल चिंतीत होण्याची गरज आहे. आम्ही खूप जास्त अतिरिक्त धावा दिल्या. मैदानातही आमच्याकडे अनेक संधी होत्या, आम्ही आज खूप काही गमावलं.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 344 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 48.2 षटकात 4 विकेट्स गमावत 345 धावा केल्या आणि सामना जिंकला. पाकिस्तानच्या डावात श्रीलंकेने एकूण 26 अतिरिक्त धावा खर्च केल्या. यातील 23 धावा या फक्त वाईड चेंडूच्या होत्या. पहिल्या सामन्यातही संघाने 23 अतिरिक्त धावा दिल्या होत्या. वनडे क्रिकेटमध्ये याच धावा विजय-पराभवाचं अंतर ठरवतात. याव्यतिरिक्त एकाच षटकात श्रीलंकेच्या खेळाडूंनी तीन झेल सोडले होते. त्यामुळे त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. (Sri Lanka captain dasun shanaka says we were 20 to 25 runs short on this wicket read more here)
हेही वाचा-
PAKvsSL सामन्यानंतर Points Tableमध्ये मोठा उलटफेर; विजयानंतरही पाकिस्तान ‘या’ स्थानी, तर भारत…
‘भारतीय खेळाडूंना…’, विराट-नवीन वादाविषयी अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे विधान जिंकेल 140 कोटी भारतीयांचे मन