भारतीय संघाला वेस्ट इंडिज संघाने पाचव्या टी20 सामन्यात पराभूत केले. उभय संघांतील ही मालिका वेस्ट इंडिजने 3-2 अशा अंतराने जिंकली. भारताच्या या पराभवानंतर अनेक माजी क्रिकेटपटू आपली प्रतिक्रिया देत आहेत. भारताचे माजी कर्णधार व सर्वकालीन महान सलामीवीर सुनील गावसकर यांनी अत्यंत तिखट शब्दात भारतीय संघातील युवा खेळाडूंना सल्ला देताना टीका केली आहे
वेस्ट इंडिजने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले होते. मात्र, त्यानंत र दोन सामने जिंकून भारतीय संघाने उत्कृष्ट पुनरागमन केले. परंतु, पाचव्या टी20 मध्ये पुन्हा एकदा वेस्ट इंडिज संघाने भारतावर मात करत मालिका जिंकली. या पराभवानंतर भारतीय संघातील युवा खेळाडूंना सल्ला देताना गावसकर यांनी अत्यंत तीव्र शब्द वापरले. एका स्तंभामध्ये लिहिताना ते म्हणाले,
“खेळाडू फ्रँचायझी स्तरावर चांगली कामगिरी करतो. परंतु जेव्हा देशासाठी खेळण्याचा विचार येतो तेव्हा तो दबाव आणि अपेक्षा वेगळ्या असतात. हा एक वरचा दर्जा आहे. 19 वर्षांखालील खेळाडूंची स्पर्धा गाजवलेले अनेक क्रिकेटपटू आपण वरच्या स्तरावर तीच कामगिरी अनेकदा करू शकले नाहीत.”
त्यांनी पुढे लिहिले,
“मुले मुलांविरुद्ध खेळताना दिग्गज वाटतात. मात्र, जेव्हा ते वरिष्ठांसोबत खेळतात तेव्हा उघडे पडतात. दुरून केक वाटणारा तो तुकडा प्रत्यक्षात चिखल असतो.”
वेस्ट इंडीज दौऱ्यावर अनेक युवा भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडली. यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा व मुकेश कुमार यांनी या दौऱ्यावर आपले पदार्पण केले. विशेष म्हणजे या सर्वांची कामगिरी उत्कृष्ट राहिली. भारताने या दौऱ्यावर कसोटी व वनडे मालिका आपल्या नावे केली. मात्र, टी20 मालिकेत नजीकचा पराभव स्वीकारला.
(Sunil Gavaskar Bold Statement On Young Cricketers In Column)
महत्वाच्या बातम्या –
योनेक्स सनराईज माजी आमदार कै. विनायक निम्हण बॅडमिंटन स्पर्धेत आठ खेळाडूंना विजेतेपद
अखेर तो क्षण आला! जसप्रीत बुमराह आपल्या घातक फॉर्ममध्ये परतला, नेट्समधील व्हिडिओ व्हायरल