इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२च्या समाप्तीनंतर सर्वांच्या नजरा ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेवर लागल्या आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका सुरू होण्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना एक धक्कादायक सल्ला दिला आहे.
सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी स्टार स्पोर्टसशी बोलताना सांगितले की, “हार्दिक पंड्या (hardik Pandya) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी आगामी मालिकेत भारतासाठी पाच किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली तर संघ केवळ सहा षटकांत १२० धावा करू शकतो. हार्दिक आणि रिषभ दोघेही आपल्या धडाकेबाज अंदाजात जलद गतीने फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हे दोघे ६ षटकांंत १२० धावा करू शकतील. असा विश्वास गावस्करांनी व्यक्त केला आहे”
“जर भारताकडे हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत पाच किंवा सहा क्रमांकावर असतील. तेव्हा १४व्या ते २०20व्या षटकापर्यंत काही स्फोटक फलंदाजी केली, तर सहा षटकांत, तुम्ही कदाचित १००-१२० धावांचीही अपेक्षा करू शकता. ते हे करण्यास सक्षम आहेत. तो एक रोमांचक पैलू असणार आहे. याची मी खरोखरच आतुरतेने वाट पाहत आहे. रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या पाच किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात,” असे म्हणत गावस्कर यांनी राहुल द्रविड यांना सल्ला दिला आहे.
दरम्यान, हार्दिकने आयपीएल २०२२मध्ये ४४.२७च्या सरासरीने आणि १३१.२७ च्या स्ट्राइक रेटने ४८७ धावा केल्या. त्याने ७.२८ च्या इकॉनॉमी रेटने आठ विकेट्सही घेतल्या आहेत. शिवाय रिषभनेही यंदाच्या आयपीएलमध्ये १४ सामन्यांत १५१.७८च्या स्ट्राईक रेटने धडाकेबाज ३४० धावा बनवल्या आहेत. यावेळी रिषभची सरासरी ३०.१९ इतकी होती.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
…तर भारत ६ ओव्हर्स मध्ये १२० दावा करेल, सुनिल गावस्कर
रोहित अन् विराटला डच्चू देत भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकाचा संघ, पाहा कोणाला मिळालीय संधी
रोहित अन् विराटला डच्चू देत भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकाचा संघ, पाहा कोणाला मिळालीय संधी