आरसीबीने (RCB) अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर IPL मध्ये विजय मिळवला. त्यानंतर बंगळुरूमध्ये मोठ्या संख्येने चाहत्यांनी आनंद साजरा केला. जो नंतर चेंगराचेंगरीत बदलला. सेलिब्रेशनचं योग्य प्रकारे आयोजन केलं गेलं नव्हतं आणि खूप लोक जखमी झाले. दरम्यान, 11 लोकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर टीमसाठी अडचणी वाढल्या. आता कर्नाटक सरकारने RCB च्या विरोधात कठोर निर्णय दिला आहे.
जस्टिन जॉन मायकेल डी’ कुन्हा न्याय आयोगाने बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, DNA एंटरटेनमेंट आणि बंगळुरू पोलिस अधिकार्यांना दोषी ठरवलं होतं.
आता कर्नाटक सरकारने याला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे या सर्वांच्या विरोधात कारवाईचा मार्ग सोपा झाला आहे. 4 जून रोजी सुमारे साडेतीन वाजता चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर खूप गर्दी जमा झाली होती आणि सुमारे 50 लोक जखमी झाले होते तर 11 लोकांचा मृत्यू झाला होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलेल्या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. त्याअंतरीतही सेलिब्रेशन करण्यात आलं आणि मोठा अपघात घडला. ही चूक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, DNA एंटरटेनमेंट आणि बंगळुरु पोलिस अधिकार्यांच्या मोठ्या दुर्लक्षाने झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बंगळुरू पोलिसांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे, कारण प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असूनही तिथे फक्त 79 पोलिस कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय स्टेडियमच्या बाहेर एम्ब्युलन्सचीही सोय नव्हती, आणि जॉइंट पोलिस कमिश्नर सुमारे 30 मिनिटांनंतर घटनास्थळी पोहोचले.
RCB साठी गोष्टी काळानुसार आणखी कठीण होत चालल्या आहेत. त्यांना स्पष्टपणे दोषी ठरवण्यात आलं आहे आणि आता कर्नाटक सरकारच्या निर्णयानंतर बीसीसीआयवरही लक्ष असेल. या दुर्लक्षितपणासाठी RCB वरही कारवाई होऊ शकते. तसेच संभावना आहे की क्रिकेट कौन्सिलकडून त्यांना एका हंगामासाठी बंदी घालण्यात येईल. हा निर्णय विराट कोहली आणि बंगळुरुच्या चाहत्यांसाठी फारच वाईट ठरू शकतो.






