इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात अनेक भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. याच्या जोरावर काहींनी संघात पुनरागमन केले आहे. तर काही खेळाडू पदार्पण करणार आहेत. त्यातील एक नाव म्हणजे दिनेश कार्तिक. पंधराव्या आयपीएल हंगामामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणाऱ्या कार्तिकची बॅट चांगलीच तळपली आहे. यामध्ये त्याने अनेक सामन्यात कमी चेंडूत झटपट खेळी करत संघाला प्लेऑफच्या प्रवासात योग्य दिशा दाखवली.
कार्तिकने (Dinesh Karthik) आयपीएलच्या १६ सामन्यांत १८३.३३ स्ट्राईक रेटने ३३० धावा केल्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघनिवड अधिकाऱ्यांना विचार करण्यास लावले.
कार्तिकची दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पाच टी२० मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. ‘या मालिकेत त्याने त्याचा आयपीएलचा (IPL) फॉर्म कायम ठेवत उत्तम कामगिरी केली, तर आगामी टी२० विश्वचषकात त्याची जागा पक्की होऊ शकते,’ असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांडले आहे.
“कार्तिकला संधी मिळाली हे चांगली बाब आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याची जर अंतिम अकरामध्ये निवड झाली, तर त्याने त्याचा उत्तम खेळ करावा. तसेच त्याच्याकडे अनुभव असल्याचे संघासाठी ते फायद्याचे ठरणार आहे,” असे शास्त्री यांनी म्हटले आहे.कार्तिकने २०१९ नंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याचा २०१९च्या विश्वचषकाच्या संघात समावेश होता.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी रिषभ पंत (Rishabh Pant) हा पहिला पर्याय असणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंतही संघात असल्याने अंतिम अकरामध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.
“आपल्याला संघाच्या दृष्टीने पाहावे लागेल की त्यांना कोणत्या खेळाडूची गरज आहे? संघाला यष्टीरक्षक कोणत्या भुमिकेत पाहिजे आहे, जो उत्कृष्ठ फिनीशर ठरेल असा कि वरच्या क्रमांकावर येत फलंदाजी करेल असा खेळाडू? मी तर यष्टीरक्षक उत्कृष्ठ फिनीशर हा पर्याय निवडेल,” असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.
“एमएस धोनीनंतर भारतीय संघाला फिनीशरची कमी जाणवली आहे. पंत हा चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल पण इथे आपल्याला एक असा खेळाडू हवा आहे तो अधिक धावा करेल आणि उत्तम फिनीशरची जबाबदारीही पार पाडेल. यासाठी कार्तिक एक चांगला पर्याय आहे,” असे शास्त्री म्हणाले आहेत.
कार्तिकने २००६मध्ये भारतीय संघात पदार्पण करताना ३२ टी२० सामने खेळले आहेत. त्याचबरोबर त्याचा २००७च्या टी२० विश्वचषक विजयी संघातही समावेश होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला टी२० सामना ९ जूनला दिल्ली येथे खेळला जाणार आहे. यावेळी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पंड्यानेही २०२२च्या आयपीएलमध्ये अष्टपैलू कामगिरी केली असता तो संघात परतला आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीतील विजयासह इंग्लंडला टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये फायदा, टीम इंडिया ‘या’ क्रमांकावर
सचिन कुकला मागे टाकत रुटने रचलाय इतिहास, असं करणारा जगातील पहिला खेळाडू
विराट मोडणार सचिनच्या १०० शतकांचा विक्रम?, पाहा काय म्हणतायेत रोहितचे प्रशिक्षक