भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यातून रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा बाहेर पडले आहेत. ज्यावेळी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा केली होती, तेव्हा रोहितला संघात स्थान देण्यात आले नव्हते. दुसरीकडे ईशांतलाही कसोटी संघात सामील केले नव्हते. दोन्ही खेळाडू सध्या बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे आपल्या फिटनेसवर काम करत आहेत.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने म्हटले होते की, संघातील दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या फिटनेसवर पूर्णपणे लक्ष ठेवले जात आहे. आणि दोघेही पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ठीक होतील. परंतु आता माध्यमांतील वृत्तानुसार, फिटनेस आणि वेळेवर उपलब्ध होऊ शकणार नसल्याने रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा दोघेही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार, रोहित आणि ईशांतच्या फिटनेसवरून एनसीएमध्ये तज्ज्ञांची एक बैठक झाली होती. त्यात समजले की, दोघांचा फिटनेस रिपोर्ट उत्साहवर्धक नसल्याचे दिसून आले. यानंतर संघ व्यवस्थापन, निवडकर्ता आणि बीसीसीआयला माहिती देण्यात आली होती की, या दोन्ही खेळाडूंना कदाचित कसोटी मालिकेत खेळता येणार नाही. रोहितला सुधारित भारतीय संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सामील करण्यात आले होते.
नुकतेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित आणि ईशांतच्या दुखापतीवर बोलताना संकेत दिले होते की, हे दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर होऊ शकतात. ते म्हणाले होते, ‘दोन्ही खेळाडूंनी ३-४ दिवसांच्या कालावधीतच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाले पाहिजे. त्यामुळे वेळेत त्यांना कसोटी मालिकेचा भाग बनता येईल.’
महत्त्वाच्या बातम्या-
मुलाच्या जन्मानंतर विराट पुन्हा परतणार ऑस्ट्रेलियात? मुख्य प्रशिक्षकाचे मोठे विधान
अनोख्या पद्धतीने साजरा केला सैनीचा वाढदिवस, खेळाडू दिसले मास्कमध्ये