यंदाच्या आयीसीसी आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. भारतानं 13 वर्षांनंतर आयसीसी ट्राॅफीवर नाव कोरले आणि इतिहास रचला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) देण्यात आला. तत्पूर्वी भारतानं टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.
पाकिस्तान खेळाडू अहमद शाहजाद आणि उमर अकमल यांनी भारतानं विश्वचषक जिंकल्यानंतर भरभरुन शुभेच्छा दिल्या. अहमद शाहजाद जियो न्यूजशी बोलताना म्हणाला, “भारतानं शानदार विजय मिळवला. 3 विकेट्स गेल्यानंतर भारताच्या आशा विराट कोहलीवरती होत्या आणि त्यानं करुन दाखवलं. तो लवकर बाद झाला असता तर भारत तेवढी धावसंख्या बनवण्यात अयशस्वी राहिला असता. काही लोक बोलत होते रोहित शर्मानं बुमराहला गोलंदाजी देण्यात उशीर केला. पण मी म्हणतो की रोहितच्या जागी दुसरा कर्णधार असता तर कदाचित तो जिंकू शकला नसता.”
तर उमर अकमल म्हणाला, “एका वेळी वाटत होतं की, दक्षिण आफ्रिका सहज सामना जिंकेल परंतू ते दबावात खेळू शकले नाहीत. वाटत होतं की एक विकेट गेल्यानंतर डेव्हिड मिलरवर खूप दबाव येईल आणि तसंच झालं. जास्त निर्धाव चेंडू गेल्यामुळे मिलरवर दबाव आला. कर्णधार रोहित शर्मानं ज्याप्रकारे गोलंदाजी युनिट चालवलं ते अप्रतिम होतं. तर विराट कोहलीनं भारतासाठी जी फायनल सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीला फायनल सामन्याचं क्रेडिट जातं.”
महत्त्वाच्या बातम्या-
“आता मी बेरोजगार झालो”, राहुल द्रविड यांनी जाता-जाता दिली भावनिक प्रतिक्रिया
रोहितच्या अनोख्या सेलिब्रेशनचं ‘मेस्सी’शी कनेक्शन! या खेळाडूनं दिलं होतं खास ट्रेनिंग
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमारच्या पत्नीनं शेअर केली एक खास पोस्ट…!