दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी जेव्हा टीम इंडियाची घोषणा झाली, तेव्हा चाहत्यांना हा प्रश्न पडला की रिंकू सिंगला (Rinku Singh) संघातून का वगळले आणि त्याची नेमकी काय चूक होती.
गेल्या एक वर्षापासून रिंकू सिंग भारतीय टी20 संघात आत-बाहेर होत आहे, तर एकेकाळी तो संघाचा नियमित सदस्य होता. या 28 वर्षीय खेळाडूला मागील दोन मालिकांमध्ये फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. संघ व्यवस्थापनाने त्याच्याऐवजी अष्टपैलू खेळाडूला प्राधान्य दिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (T20 Series IND vs SA) मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला जेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादव (Team india T20 cricket captain Suryakumar yadav) प्रसारमाध्यमांसमोर आला आणि त्याला रिंकू सिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा कर्णधाराने त्याचे थेट उत्तर न देता गोल-मोल म्हणजेच अस्पष्ट स्वरूपात उत्तर दिले.
सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर आलेल्या भारतीय कर्णधाराला प्रश्न विचारण्यात आला की, व्यवस्थापन रिंकू सिंगसारख्या ‘फिनिशर’ऐवजी शिवम दुबेसारख्या (Shivam Dube) अष्टपैलू खेळाडूला प्राधान्य का देत आहे. यावर त्याने विनोदी अंदाजात सांगितले की, टीमच्या संयोजनाबद्दल त्याला पत्रकारांच्या आधी माहिती मिळते. त्याचबरोबर त्याने शिवम दुबेला संघात घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.
सूर्यकुमार यादव म्हणाला, शिवम दुबे एक अष्टपैलू आहे, त्यामुळे तो आणि हार्दिक दोघेही अष्टपैलू आहेत. त्यामुळे तुम्ही एका अष्टपैलूची तुलना फिनिशरशी करू शकत नाही. सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, तीन ते सात क्रमांकापर्यंतचे सर्व फलंदाज कोणत्याही ठिकाणी फलंदाजी करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे फलंदाज कोणत्या वेळी फलंदाजीसाठी येतो, यावर ते अवलंबून असते. आम्हाला त्या दरम्यान खरोखर लवचिक (फ्लेक्सिबल) राहावे लागेल. आणि सोबतच, संघाच्या संदर्भात, टीम कशी दिसेल हे तुम्हाला आमच्या आधीच समजेल किंवा नाही, पण हो, जास्त शक्यता आहे. संघ चांगला दिसत आहे, मजबूत आहे, म्हणून मी खूप आनंदी आहे.
सूर्यकुमारने शिवम दुबेचे खूप कौतुक केले आणि टीमच्या संयोजनात त्याने आणलेल्या संतुलनाचा उल्लेख केला.
कर्णधार सूर्या म्हणाला, मला वाटते की तुम्ही आशिया कपमध्येही पाहिले असेल. जेव्हा तो नवीन चेंडू टाकत होता. तेव्हा प्लेइंग इलेव्हनच्या दृष्टीने त्याने आमच्यासाठी अनेक पर्याय, अनेक कॉम्बिनेशन्स उघडले. हेच तो संघाला देतो. त्याचा अनुभव त्याने सर्व सामन्यांमध्ये, सर्व चांगल्या खेळांमध्ये, सर्व मोठ्या खेळांमध्ये – आयसीसी स्पर्धा, एसीसी स्पर्धा – ज्या प्रकारे खरोखर चांगली कामगिरी केली आहे. मला वाटते की अनुभवाचे खूप महत्त्व असेल. आणि त्याची उपस्थिती निश्चितच संघाला एक चांगला समतोल देईल.
रिंकू सिंग त्याच्या मागील 10 डावांमध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. त्याने या दहा डावांमध्ये 16.75 च्या सरासरीने आणि 128.84 च्या स्ट्राइक रेटने 134 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा सर्वाधिक स्कोर 53 आहे. जरी हे आकडे त्याचा फॉर्म निराशाजनक असल्याचे दर्शवत असले तरी, त्याला सतत संधी न मिळाल्याने त्याची समस्या आणखी वाढली आहे. दरम्यान, हा डावखुरा फलंदाज सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये उत्तर प्रदेशसाठी खेळत आहे.






