---Advertisement---

India Test Captain: टीम इंडियाच्या कसोटी नेतृत्वासाठी ‘हे’ दोन चेहरे चर्चेत..!

---Advertisement---

भारताचा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्माने (Rohit Sharma) अलिकडेच कसोटीतून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्याने इंस्टा स्टोरिद्वारे निवृत्तीबाबत माहिती दिली. त्याच्यानंतर आता दिग्गज विराट कोहलीने (Virat Kohli) बीसीसीआयकडे कसोटीच्या निवृत्तीबाबत माहिती पाठवली पण बीसीसीआयने (BCCI) त्याला पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. पण आता टीम इंडियाचा कसोटी कर्णधार कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

भारतीय संघाचा जून महिन्यात इंग्लंड दौरा आहे. या दौऱ्यावर भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. त्याआधी भारतीय संघाला आपला कर्णधार निश्चित करायचा आहे. यादरम्यान मीडिया रिपोर्टनुसार (23 मे) रोजी भारतीय संघाला नवा कसोटी कर्णधार मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन कर्णधाराच्या घोषणेसाठी बीसीसीआय (23 मे) रोजी पत्रकार परिषद घेणार आहे, तसेच इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवड आणि कर्णधार पदाची घोषणा त्यावेळी करण्यात येणार आहे.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (PTI) रिपोर्टनुसार भारतीय संघाचे कर्णधारपद आणि उपकर्णधारपद युवा खेळाडूंकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान कर्णधारपदासाठी शुबमन गिल (Shubman Gill) आणि उपकर्णधारपदासाठी डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे (Rishabh Pant) नाव चर्चेत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---