टी20 विश्वचषक 2022 (2022 T20 World Cup) मधील सर्वात बहुप्रतिक्षित सामना भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्यादरम्यान मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने सार्थ ठरवला. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) व दुसरा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना स्वस्तात बाद करत भारतीय संघाला सामन्यात आघाडी म्हणून दिली. बाबरला खातेही न खोलू देता त्याने तंबूत धाडत 30 वर्षापूर्वीच्या घटनेची आठवण करून दिली.
एमसीजीच्या मैदानावरील जवळपास सव्वा लाख लोकांच्या साक्षीने खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताला दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यश मिळाले. भारतातर्फे विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या अर्शदीप सिंगने आपला पहिलाच चेंडू टाकताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पायचित केले. पहिलाच चेंडू खेळत असलेला बाबर खातेही खोलू शकला नाही.
यासोबतच 30 वर्षापूर्वी सिडनी येथे 1992 विश्वचषकात झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची आठवण सर्व क्रिकेटप्रेमींना झाली. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी त्यावेळी प्रथमच विश्वचषकात एकमेकाविरुद्ध विश्वचषकात खेळत होते. पाकिस्तानचे नेतृत्व करत असलेल्या दिग्गज अष्टपैलू इम्रान खान यांनादेखील त्या सामन्यात खाते खोलता आले नव्हते. त्यांनी पाच चेंडूंचा सामना केला व एकही धाव न बनवता धावबाद होत तंबूत परतले. विशेष म्हणजे भारतीय संघाने त्या सामन्यात 45 धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे एकप्रकारे ऑस्ट्रेलियात खेळत असताना पाकिस्तानी कर्णधार भारतीय संघापुढे झिरो ठरत असल्याचे म्हटले जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच
‘त्यांनी चांगली गोलंदाजी केली’, अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांच्या बॉलर्सचे बटलरकडून कौतुक