भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्या पाहायला मिळाल्या होत्या. तोच धागा पकडून भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट नियमक मंडळ (बीसीसीआय) व भारतीय संघावर टीकास्त्र डागले आहे.
उभय संघातील पहिला सामना भारतीय संघाने नागपूर येथे एकतर्फी आपल्या नावे केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पिछाडीवरून पुनरागमन करत विजय संपादन केला. तर, ऑस्ट्रेलियाने इंदोर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात पलटवार करत विजय मिळवला. विशेष म्हणजे हे तीनही सामने केवळ तीन दिवसांच्या आत निकाली निघाले. त्यामुळे या अखेरच्या सामन्यासाठी कशी खेळपट्टी उपलब्ध होते याकडे सर्वांची नजर लागली आहे.
मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात जशा प्रकारची खेळपट्टी होती त्याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले,
“भारतात वेगवान गोलंदाजांच्या जीवावर 20 बळी घेणे सोपे काम नाही. भारतीय संघातून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व सिराज यांना बाहेर केल्यास भारतीय गोलंदाज विरोधी फलंदाजांना दोन्ही डावात बाद करू शकणार नाहीत. याच कारणाने तुम्ही भारतात फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्या पाहता. फिरकी गोलंदाजी आपली ताकद आहे. त्यामुळे अशा खेळपट्ट्या तयार करून फलंदाजांची ताकद आजमावली जाते.”
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी ही प्रामुख्याने फिरकीला मदतगार असलेली दिसून येते. त्यामुळे अखेरच्या सामन्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टी मिळणार की, फलंदाजांना फायदा करून देणारी हे पाहावे लागेल.
(Veteran Sunil Gavaskar Slams Team India For Preparing Spin Friendly Wickets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे मालिकेतून बाहेर पडला ‘हा’ ऑस्टेलियन गोलंदाज, बुमराहनंतर मुंबई इंडियन्ससाठी दुसरा मोठा धक्का
VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर सूर्याने खेळला ‘सुपला शॉट’! व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, तुम्ही पाहिला का?