अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखाली विदर्भाने रणजी करंडक 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. केरळविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिल्यानंतर पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विदर्भाला विजेता घोषित करण्यात आले. दानिश मालेवारला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. त्याने पहिल्या डावात 153 आणि दुसऱ्या डावात 73 धावा केल्या. करुण नायरनेही पहिल्या डावात 86 धावांची महत्त्वाची खेळी केली. त्याने दुसऱ्या डावात शतक झळकावले. हे विदर्भाचे तिसरे रणजी करंडक विजेतेपद आहे.
केरळने नाणेफेक जिंकून 2025 च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दानिश मालेवार आणि करुण नायर यांनी विदर्भाच्या 379 धावा केल्या. केरळने पहिल्या डावात 342 धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे विदर्भाने 37 धावांची आघाडी घेतली होती.
रणजी ट्रॉफीच्या नियमांनुसार, जर विजेतेपदाचा सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते. अशाप्रकारे विदर्भाने तिसरी रणजी ट्रॉफी जिंकली.
बीसीसीआयने रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भ संघाला 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले. उपविजेत्या संघाला बीसीसीआयने 3 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले.
बीसीसीआयचे माजी सचिव आणि सध्याचे आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये बक्षीस रकमेत वाढ केली होती. रणजी ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीतून बाहेर पडलेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील.
महत्वाच्या बातम्या :
विराट कोहलीचा महान विश्वविक्रम! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
“कोहलीपेक्षा बाबर श्रेष्ठ? पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकांची वादग्रस्त टिप्पणी!”






