टोकियो पाॅरालिम्पिकच्या पाचव्या दिवशी भारताने स्पर्धेत तीन पदक जिंकून इतिहास रचला आहे. पाॅरालिम्पिक खेळांमध्ये सर्वात जास्त पदक मिळवण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल टाकले आहे. भारतासाठी भाविनाबेन पटेलने रौप्य पदक जिंकून देशासाठी पाॅरालिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदकांचे खाते उघडले आहे. तसेच निषाद कुमारने उंच उडीमध्ये देशासाठी रौप्यपदक जिंकले आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवसाचा शेवट विनोद कुमारच्या कांस्य पदकाने झाला. त्याने हे थाळी फेकमध्ये त्याचा स्वत:चा विक्रम तर मोडलाच, पण आशियाई विक्रमही मोडला आहे.
विनोद कुमारने एफ५२ गटात १९.९१ मीटर लांब थाळी फेकली आणि देशासाठी कांस्यपदक जिंकले. त्याचा पाॅरालिम्पिकपर्यंतचा प्रवास खूप कठीण होता. देशासाठी सीमेवर रक्षा करण्यापासून ते पाॅरालिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत विनोदला अनेक अडचणी आल्या. त्याच्या या संपूर्ण प्रवासावर एक नजर टाकुयात –
आजपासून ९ वर्षांपूर्वी २०१२ मध्ये जेव्हा विनोद ३२ वर्षाचा होता, तेव्हा हरियाणाच्या रोहतकमध्ये एक सर्वसामांन्य आयुष्य जगत होता. तो राजीव गांधी स्पोर्ट्स काॅम्पलेक्सजवळ एका छोटे किराणा दुकान चालवत होता. तो दिवसभर तेथे येणाऱ्या खेळाडूंना मेहनत करताना पाहत असे. विनोदने देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, २००२ मध्ये त्याच्या पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीने त्याला पॅरालाइज केले.
विनोद त्याच्या दुकानातून केवळ घरखर्च भागेल एवढीच कमाई करत होता. दरम्यानच्या, काळात त्याने पॅरा स्पोर्ट्सबाबद माहिती गोळा केली. मात्र, याच्यासाठी लागणारा पुढच्या खर्चाची माहिती घेतली, तेव्हा त्याने त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करण सोडून दिलं. त्याची ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली, जेव्हा २०१६ मध्ये भारताची सध्याची पाॅरालिम्पिक अध्यक्षा दीपा मलिकने रियो पाॅरालिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकले. ती देशासाटी पाॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली होती. दीपा मलिकच्या या करनाम्यामुळे विनोदला त्याच्या कमतरतांमधून बाहेर येत थाळी फेकमध्ये नाव कमावण्याची प्रेरणा मिळाली.
विनोद एका मुलाखतीत याविषयी बोलला होता की, दिपा मलिकच्या रौप्य पदकाने मला विश्वास मिळवून दिला की, मी देखील देशाचा सन्मान वाढवण्यासाठी आपले योगदान देऊ शकतो. नेमबाजी प्रशिक्षक संजय सुहागने त्याला त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि एथलेटिक्स प्रशिक्षक अमरजीत सिंग यांच्याशी भेट करून दिली.
विनोदने सराव सुरू केला आणि पुढच्या वर्षी जयपुरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि कांस्य पदक जिंकले. विनोदने २०१८ मध्ये पुन्हा हाच करनामा केला, यानंतर प्रशिक्षक सत्यनारायण त्याला घेऊन २०१९ मध्ये पॅरिसला गेले आणि तेथे त्याला आंतरराष्ट्रीय पाॅरालिम्पिक कमिटीने पुढच्या दोन वर्षासाठी टी/एफ५२ गटात सामील केले.
यानंतर विनोदने २०१९ मध्ये दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या एथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भाग घेतला आणि चौथा क्रमांक कायम राखला. त्यानंतर त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे टोकियो पाॅरालिम्पिकसाठीचे दरवाजे उघडले गेले. आयपीसीने विनोदला केवळ दोन वर्षांसाठी पाॅरा एथलिट गटात जागा दिली होती. यानंतर २०२० मध्ये कोरोनामुळे स्पर्धा होऊ शकल्या नाहीत आणि विनोदला पुन्हा एकदा आयपीसीसमोर जाऊन नोंदणी करावी लागली होती.
विनोद कुमार सीमा सुरक्षा बलमध्ये (बीएसएफमध्ये ) जवान होता. मात्र, एका दुर्घटनेमुळे त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आणि तो पॅरालाइज झाला. त्यानंतरचा प्रवास त्याच्यासाठी सामान्य नव्हता, पुढच्या १० वर्षांपर्यंत विनोदला अंथरुणातून उठून बसणेही कठीण होते. तो त्याच्या बऱ्याच कामांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून होता. दवाखान्याच्या खर्चामुळे घरची आर्थिक स्थितीही काही ठीक नव्हती.
वर्ष २०१२ मध्ये विनोदचा विवाह झाला आणि तो आता दोन मुलींचा वडील आहे. कुटुंबाच्या वाढत्या खर्चांसोबत त्याचे उत्पन्न मात्र वाढत नव्हते, यामुळे त्याच्यावर खूप कर्ज झाले होते. पॅरिसला जाण्यासाठी त्याने त्याच्या बहिणीकडून ३.५ लाख रुपये कर्ज घेतले होते, जे त्याने अजूनही परत केलेले नाही.
ऑक्टोबर २०२० मध्ये पीसीआयसह भारतीय खेळ प्राधिकारनने बेंगलोरमध्ये ट्रेनिंग कॅंप आयोजित केला होता. याच ठिकाणी विनोदने पाॅरालिम्पिक स्पर्धेसाठी सराव केला. यादरम्यानच्या काळात त्याच्या पत्नीने दुकान सांभाळत दैनंदिन सर्व कामांची जबाबदारी पार पाडली. विनोदसाठी अडचणी तेव्हाही वाढल्या जेव्हा, तो दोन वेळा कोरोनाबाधीत आढळला आणि दोन्ही वेळा त्याला दवाखान्यात भरती केले गेले. असे असले तरी शेवटी त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पॅरालिम्पिकमध्ये भाविनाबेनची ‘रुपेरी’ कामगिरी, ‘या’ लोकांना केले पदक समर्पित
आनंदाची बातमी! टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारताच्या भाविना पटेलने जिंकले ‘रौप्य पदक’