कोलकाता। आजपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना(Day-Night Test) आहे. भारत आणि बांगलादेशचा दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. याचमुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली हा दिवस-रात्र कसोटीमध्ये भारताचे नेतृत्व करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
तसेच आज कोहलीसह भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळालेल्या खेळाडूंचे नाव भारताकडून पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणारे खेळाडू म्हणून कसोटी क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल.
त्याचबरोबर बांगलादेशच्याही अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळालेले खेळाडूही बांगलादेशकडून पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणारे खेळाडू ठरले आहेत.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टॉप ५: ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत भारतीय खेळाडू करु शकतात हे खास ५ विक्रम
वाचा???? https://t.co/WwGUbDhtLK????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest— Maha Sports (@Maha_Sports) November 22, 2019
ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
वाचा????https://t.co/qnGWVdu4ef????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest— Maha Sports (@Maha_Sports) November 22, 2019






