शनिवारचा (14 जुलै) दिवस भारतीय संघासाठी खास ठरला. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डॉमिनिका कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचा 1 डाव आणि 141 धावांनी विजय झाला. यशस्वी जयस्वाल व रविचंद्रन अश्विन भारताच्या विजयाचे नायक ठरले. भारतीय संघाच्या या विजयानंतर अनुभवी विराट कोहली याने देखील एक मोठा पराक्रम नोंदवला.
केवळ तीन दिवसात समाप्त झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलमधील भारताचा हा पहिला सामना होता. या सामन्यात विजय मिळवताना भारताने बारा गुणांची कमाई केली.
भारतीय संघाने हा विजय संपादन केल्यानंतर विराट कोहली हा भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. विराटने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळताना 499 सामन्यांमध्ये 296 विजयांमध्ये हजेरी लावली आहे. या क्रमवारीत त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याला मागे टाकले. त्याने आपल्या कारकिर्दीत 538 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 295 विजयामध्ये आपला सहभाग नोंदवलेला. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून, त्याने आपल्या कारकिर्दीत तब्बल 664 सामने खेळताना 306 विजयावेळी उपस्थिती दर्शवलेली.
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट (Kraigg Brathwaite) नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय भारतीय संघाने चुकीचा ठरवला. यावेळी त्यांचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल व रोहित शर्मा यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 5 विकेट्स गमावत 421 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताला 271 धावांची आघाडी मिळाली. विजयासाठी मिळालेले 272 धावांचे आव्हान पार करताना यजमान संघ केवळ 130 धावांमध्ये गारद झाला. पदार्पणात 171 धावांची खेळी करणारा यशस्वी जयस्वाल सामनावीर ठरला.
(Virat Kohli Complete 296 Wins With Team India Pass MS Dhoni)
महत्वाच्या बातम्या –
Asian Games 2023 । भारतीय संघाची घोषणा, ‘असे’ आहे हरमनप्रीतच्या नेतृत्वातील स्क्वॉड
भारतीय संघात निवड होताच रिंकूची मोठी प्रतिक्रिया, फक्त एकाच शब्दात झाला व्यक्त