बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2023चा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांच्या तुलनेत चौथ्या कसोटीदरम्यान खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक अनुकूल दिसली. परिणामी दोन्ही संघाच्या फलंदाजांनी या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा करून घेतला. विराट कोहली अहमदाबाद कसोटीच्या या पहिल्याच डावात स्वतःचे शतक पूर्ण केले. यादरम्यानत भारताकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मानही विराटला मिळाला.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत जगभरात कसोटी मालिका खेळल्या जात आहे. अजिंक्यपद स्पर्धेचा 2021-2023 हंगाम अंतिम टप्प्यात आला असून अंतिम सामन्यात जागा पक्की करण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करत आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी अहमदाबात कसोटीत विजय मिळवणे भारतासाठी महत्वाचे होते. पण आता हा सामना निकाली निघण्याची शक्यता नाहीये. दरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) याने रविवारी (12 मार्च) केलेल्या वादळी प्रदर्शनाच्या जोरावर तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma ) या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. पण रविवारी विराटने रोहितला मागे टाकत यादीत पहिला क्रमांक पटकावला. रोहित शर्मा याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत 1794 धावा केल्या आहेत आणि तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण विराटने या स्पर्धेत रविवारी स्वतःच्या 1800* धावा पूर्ण केल्या. हा आकडा पुढेही वाढतच होता. अशात विराट आता यादीत पहिल्या, रोहित दुसऱ्या, तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara ) क्रमांकावर आहे. पुजाराने या पर्धेत आतापर्यंत एकूण 1728 धावा केल्या. यादीत पहिल्या क्रमांकावर आलेल्या विराटने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 1803 धावा केल्या आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – 1803 (52 डाव)
रोहित शर्मा – 1794 (36 डाव)
चेतेश्वर पुजारा – 1728 (60 डाव)
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतासह श्रीलंका संघ प्रमुख दावेदार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मात्र आधीच अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत भारताला विजय मिळवता आला नाही, तर भारताचे अंतिम सामन्यात पोहोचण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते. अशात भारत अंतिम सामना खेळणार की नाही, हे श्रीलंकेच्या प्रदर्शनावर ठरेल.
(Virat Kohli has scored the most runs for India in WTC)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे 4 खेळाडू, विराटने एकदा नाही, तर दोनदा केलाय रेकॉर्ड
पहिल्या 50 शतकांपेक्षा शेवटच्या 25 शतकांसाठी निघाला विराटचा घाम, आकडेवारीतून दिसतात परिश्रम