यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. (27 जून) रोजी गयाना स्टेडियमवर सामना रंगणार आहे. भारत 2024 पूर्वी 4 वेळा टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलं होतं, त्यापैकी फक्त 2 वेळा विजय मिळाला आहे. परंतू आतापर्यंत कोहली हा टी20 विश्वचषकाच्या बाद फेरी सामन्यात विकेट घेणारा शेवटचा खेळाडू आहे. गेल्या 8 वर्षांपासून कोहली भारतासाठी बाद फेरीत विकेट घेणारा शेवटचा गोलंदाज राहिला आहे.
2016 च्या टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनं हे आव्हान 7 विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केलं आणि फायनलमध्ये धडक मारली होती. या सामन्यात वेस्ट इंडिजची तिसरी आणि शेवटची विकेट जॉन्सन चार्ल्सची होती. चार्ल्सनं त्या सामन्यात 36 चेंडूत 52 धावा केल्या आणि विराट कोहलीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मानं त्याचा झेल घेतला. त्यानंतर टी20 विश्वचषकातील एकाही बाद फेरीत भारतीय गोलंदाजाला एकही विकेट घेता आली नाही.
त्यानंतर 2021च्या टी20 विश्वचषकात भारताला बाद फेरी गाठता आली नाही. 2022च्या विश्वचषकात भारत बाद फेरीत पोहचला. जिथं त्यांचा सामना इंग्लंडशी झाला. पण इंग्लंडनं एकही विकेट न गमावता भारताचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. आता 2024च्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पुन्हा एकदा इंग्लंडशी सामना होणार आहे. बाद फेरी सामन्यात आता कोहलीचं रेकाॅर्ड 8 वर्षानंतर भारताचा कोणता गोलंदाज मोडणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
विराट कोहलीकडून (Virat Kohli) यंदाच्या टी20 विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली नाही, ज्याची सर्व चाहत्यांना अपेक्षा होती, साखळी सामन्यात विराट कोहली पूर्ण फ्लाॅप गेला. परंतू भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये कोहलीकडून योगदानाची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध रोहित-विराटचं वर्चस्व! पहा आकडेवारी
रॉबिन्सननं एका षटकात दिल्या 43 धावा! 134 वर्षात पहिल्यांदाच घडला इतिहास, पाहा व्हिडिओ
IND vs ENG सेमीफायनल 2 सामन्यासाठी का नाही राखीव दिवस? जाणून घ्या