इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (२५ ऑगस्ट) भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय इंग्लिश गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीमध्ये चुका केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना देखील चुका केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान रोहित शर्माने झेल सोडल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सध्या सोशल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यात फ्लॉप ठरलेल्या इंग्लिश सलामीवीर फलंदाजांनी तिसऱ्या कसोटी सामन्यात संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. तर झाले असे की, ३७ वे षटक टाकण्यासाठी बुमराह गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसराच चेंडू हसीबच्या बॅटचा कडा घेत दुसऱ्या स्लीपमध्ये असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला होता. हा झेल तसं तर कठीण होता. परंतु रोहितसारख्या क्षेत्ररक्षकासाठी हा झेल इतका अवघड नव्हता. परंतु त्याने जेव्हा झेल सोडला तेव्हा पहिल्या स्लीपमध्ये उभा असलेल्या विराटने संतापजनक प्रतिक्रीया दिली होती.
रोहितने जेव्हा झेल सोडला तेव्हा विराटने रोहितकडे पाहून संतापजनक प्रतिक्रीया दिली आणि चेंडू पकडण्यासाठी धावला. परंतु तो चौकार अडवू शकला नाही आणि या चौकारासह हसीबने अर्धशतक पूर्ण केले. तर रोहितने त्यावेळी हसीबचा झेल पकडला असता तर सध्या सामन्याची स्थिती काही वेगळी असती.
इंग्लंड संघाकडून रॉरी बर्न्स ५२ धावा तर हसीब ६० धावा करून मैदानावर टिकून आहेत. दिवसाखेर इंग्लंड संघाने एकही गडी न गमावता १२० धावा केल्या आहेत. यासह इंग्लंड संघाने ४२ धावांची आघाडी घेतली आहे. (Virat Kohli reaction after Rohit Sharma dropped catch of Haseeb hameed in slip,watch video)
Fifty for @HaseebHameed97! ????
Scorecard/Clips: https://t.co/UakxjzUrcE@IGCom | #ENGvIND pic.twitter.com/TPayy5RQKv
— England Cricket (@englandcricket) August 25, 2021
भारतीय संघाचा डाव ७८ धावांवर संपुष्टात
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला होता. संघातील मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात अवघ्या ७८ धावा करता आल्या. या डावात रोहित शर्माने सर्वाधिक १९ तर अजिंक्य रहाणेने १८ धावांचे योगदान दिले. तर इंग्लंड संघाकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओवरटन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला स्वस्तात गुंडाळल्यानंतर अंडरसन म्हणाला, ‘आम्ही तेच केलं जे करायचं होतं’; वाचा पूर्ण भाष्य
दुःखद बातमी! ‘हॉल ऑफ फेम’ माजी इंग्लिश कर्णधाराचे निधन निधन
आंतरराष्ट्रीय पदार्पणात गांगुली, द्रविडची विकेट घेणाऱ्या अंपायरचा लीड्स सामन्यातून कसोटीत ‘डेब्यू’