रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी सांगितले की, रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण वेगळंच असेल, परंतु त्याच्या संघाने आयपीएलमध्ये ‘बायो बबलमध्ये’ राहण्याचा आणि चाहत्यांशिवाय खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे, तर आरसीबी पहिला सामना २१ सप्टेंबरला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध खेळणार आहे.
विराट म्हणाला की, या स्पर्धेदरम्यान एकाचवेळी अनेकांना आंनदीत करण्याची संधी आमच्याकडे आहे. आरसीबी संघ २१ ऑगस्टला युएईमध्ये पोहचला आणि दोन आठवड्यांपासून सराव करीत आहे.
पत्रकार परिषदेत विराट म्हणाला, परिस्थिती स्वीकारणे हे सर्वात मोठे आव्हान होते. बायो बबलसह आपण जे काही उपलब्ध आहे, त्याचा स्वीकार करणे आणि त्याचे कौतुक करण्यास शिकलो आहोत. आता आम्हाला हे सर्व आरामदायी वाटते. तो म्हणाला, ‘जर आपण ते स्वीकारले नाही तर आजूबाजूच्या वातावरणामुळे आपण दु: खी किंवा निराश होऊ, परंतु माझ्या संघामधील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे. कोणीही निराश नाही.’
तो म्हणाला, आयपीएल प्रथमच प्रेक्षकांशिवाय खेळली जाईल. हे विचित्र असेल, याला नाकारता येणार नाही. परंतू, सराव सत्रानंतर समज थोडा बदलला आहे.
विराट म्हणाला, ‘शेवटी आम्ही खेळायला सुरुवात केली. कारण आमचे खेळावर प्रेम आहे. प्रेक्षक हा खेळाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु आपण त्यासाठी खेळत नाही. स्टेडियम रिकामे ठेवण्याचा अर्थ असा नाही की आपल्या कामगिरीमध्ये कोणतीही कमतरता असेल. तो म्हणाला, या सर्वामागे एक मोठे कारण आहे, आपल्याकडे बर्याच लोकांना आनंद देण्याची हीच वेळ आहे.”
आरसीबीचा आयपीएल २०२० संघ-
विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस, जोश फिलिप, मोईन अली, आरोन फिंच, एबी डिविलियर्स, शाहबाज अहमद, पार्थिव पटेल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, इसुरु उदाना, डेल स्टेन, पवन नेगी, देवदत्त पद्धिकल, शिवम दुबे , उमेश यादव, गुरकीरत मान सिंह, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झम्पा