भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी हार्दिक पांड्या याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेतून नियमित कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनी माघार घेतली. मात्र, त्याचवेळी विराट कोहली बाबत एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विराट वनडे व कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष देण्यासाठी आंतरराष्ट्रीय टी20 मधून ब्रेक घेऊ शकतो.
विराट कोहली सध्याही भारताचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून गणला जातो. तिने प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी शानदार होताना दिसते. मात्र, भविष्याचा विचार करता तो टी20 संघात केवळ महत्त्वाच्या मालिकांसाठी दिसू शकतो.
काही माध्यमांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, विराट श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी उपलब्ध असणार नव्हता. मात्र, तो वनडे मालिकेतून पुनरागमन करेल. तो टी20 क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या मालिकांमध्ये दिसू शकतो. वनडे आणि कसोटी क्रिकेटला पाहतो पुढील काळात जास्त प्राधान्य देताना दिसणार आहे.”
विराट टी20 विश्वचषकात सर्वात यशस्वी फलंदाज होता. मात्र, भारताला उपांत्य फेरीतच पराभूत व्हावे लागलेले. त्यानंतर टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे देण्यात यावे अशी मागणी होत होती. आगामी टी20 विश्वचषक 2024 मध्ये होणार असल्याने त्याआधी एक मजबूत संघ तयार होईल अशी अपेक्षा अनेकांना आहे. त्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना संघातून बाहेर करत युवा खेळाडूंना संधी देण्यात यावी असा एक मतप्रवाह तयार होताना दिसतोय. बीसीसीआय देखील लवकरच हार्दिक याला टी20 संघाचा नियमित कर्णधार म्हणून नियुक्त करू शकते.
(Virat Kohli To Take Break From T20I Will Continue To Play For ODI And nd Test Reports)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे 5 महिने क्रिकेटपासून दूर? मुंबईचे 17 कोटी पाण्यात
“सनरायझर्स हैदराबाद खेळाडूंना योग्य वागणूक देत नाही”, माजी खेळाडूचा सनसनाटी आरोप