नुकतेच भारतीय कर्णधार विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली आहे. यावर अनेक क्रिकेट जाणकारांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचाही यात समावेश आहे. ३२ वर्षीय विराटचा टी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांचे मत आहे. शर्मा यांच्या मते, या निर्णयानंतर विराट अधिक जोमाने आणि लक्ष केंद्रित करून आगामी टी-२० विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करेल.
कोहलीने गुरुवारी (१६ सप्टेंबर) आपल्या ट्विटर हँडलवरून घोषणा केली की, ‘ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुबईत होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकानंतर आपण टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहोत.’
राजकुमार यांनी या प्रकरणावर बोलतांना विराटच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, ‘नवीन कर्णधार नवीन कल्पना आणेल आणि कोहली त्यांना माजी कर्णधार एमएस धोनीप्रमाणे मदत करेल. नवीन कर्णधार नवीन रणनीती आणि नवीन कल्पना आणेल, त्यामुळे नवा कर्णधार कोण बनतो, हे पाहणे औत्सुकत्याचे ठरेल.’
ते पुढे म्हणाले की, ‘विराटला आता अधिक इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाने टी-२० विश्वचषक जिंकण्याची इच्छा असेल आणि त्याला आपले टी-२० संघाचे कर्णधारपद उंचीवर नेऊन सोडावे लागेल. हा एक चांगला आणि योग्य निर्णय आहे. त्याने माझ्याशी याबाबत चर्चाही केली होती.’
‘वर्कलोड’बाबत बोलताना राजकुमार म्हणाले, ‘तीनही प्रकारातील कर्णधारपद खेळाडूवर दबाव आणते आणि म्हणूनच त्याने टी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मला वाटते की योग्य वेळी घेतलेला हा योग्य निर्णय आहे. आम्ही याबद्दल चर्चा करत होतो कारण तो एक मोठा मुद्दा होता. विराटला कसोटी प्रकार आवडतो आणि त्याला या प्रकारामध्ये भारतीय संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करायचे आहे. अशा परिस्थितीत टी-२० कर्णधारपद सोडल्याने त्याच्यावरील दडपण कमी होईल.’
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला बरोबरीची टक्कर देण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह उतरेल पाकिस्तानचा संघ, पाहा संभाव्य प्लेइंग XI
‘तो’ देवदूतासारखा धावला, नाहीतर आज क्रिकेटर नव्हे पाणेपाणी विकणारा असतो; युवा शिलेदाराचा खुलासा
फक्त ७ खेळाडूंनी केलंय टी२०मध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व, चक्क २ मुंबईकरांचा आहे यात समावेश