सध्या वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक (icc u19 world cup 2022) खेळला जात आहे. भारताच्या १९ वर्षाखालील संघाने (u19 team india) शनिवारी (२९ जानेवारी) उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशला धूळ चारली आणि उपांत्य सामन्यात स्थान मिळवले. भारताचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. कारण, यादरम्यान संघात कोरोना विषाणूने शिरकाव केला होता. उपांत्य सामन्यात पोहोचल्यानंतर भारतीय कर्णधार यश धूल (yash dhull) याने इथपर्यंतच्या प्रवासाविषयी मत व्यक्त केले. सोबत त्याने माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (vvs laxman) यांच्या मार्गदर्शनाचेही कौतुक केले.
विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय संघातील कर्णधारासहीत सहा खेळाडूंना कोरोनाची लागन झाली होती. धूलने सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येण्यासाठी खेळाडूंनी एकजुटीने प्रयत्न केले आणि संघ उपांत्य सामन्यापर्यंत जाऊ शकला. धूल म्हणाला की, “आमच्या संघाचे नियोजन खूप चांगले राहिले आहे आणि खेळाडू चांगले प्रदर्शन करत आहेत. जेव्हा कधी कोणता खेळाडू निराश असेल, तेव्हा सर्वजण मिळून त्याचा उत्साह वाढवतात. हा खूप चांगला अनुभव होता.”
लक्ष्मणचे धूलकडून कौतुक
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मार्गदर्शन मिळत आहे. लक्ष्मण सध्या भारतीय संघासोबत वेस्ट इंडीजमध्ये आहेत आणि खळाडूंना योग्य मार्गदर्शन करत आहेत. धूल यासंदर्भात बोलला की, “संघात प्रत्येक दिवशी सुधारणा होत आहे. लक्ष्मस सर त्यांचे अनुभव सांगत आहेत. त्यामुळे आम्हाला खूप मदत मिळत आहे. उपांत्य सामन्यासाठी आम्ही खेळपट्टी पाहून रणनीती बनवू.”
बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्वी सामन्यात भारताच्या विजयात रवी कुमारचे महत्वाचे योगदान राहिले. त्याने १४ धावा खर्च करून महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या. परिणामी बांगलादेश संघ अवघ्या १११ धावांवर सर्वबाद धाला आणि भारताने ३०.५ षटकात विजय मिळवला. सामना संपल्यानंतर रवी म्हणाला की, “आमची रणनीती योग्य होती अचूक लाइनने गोलंदाजी करणे आणि दबाव बनवणे. मागच्या काही दिवसांमध्ये आमची तयारी चांगली होती. आम्ही खूप वेळ एकत्र घालवला आणि चांगली तयारी केली. आतापर्यंतचा अनुभव चांगला राहिला आहे आणि पुढेही चांगल्या प्रदर्शनाची कपेक्षा आहे.” भारतीय संघ आता २ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळेल.
महत्वाच्या बातम्या –
अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे लाईन अप निश्चित, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ दिवशी भिडणार भारत
सीआरपीएफ जवानाच्या मुलाची क्रिकेटच्या मैदानात ‘फायरिंग’, भारताला मिळवून दिलं सेमी फायनलचं तिकीट
एक बॉल, एक विकेट आणि १२ धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्धची ऐतिहासिक ऍशेस अनिर्णीत राखण्यात इंग्लंडला यश
व्हिडिओ पाहा –