यंदाच्या टी20 विश्वचषकातून पाकिस्तान संघ सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर पडला. पाकिस्तानला यंदाच्या टी20 विश्वचषकात अमेरिकेनं धूळ चारली. अमेरिका संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. त्यामुळे पाकिस्तानसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या. दुसऱ्या सामन्यात भारतानं 6 धावांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर पाकिस्ताननं कॅनडा आणि आयर्लंडसारख्या संघांना पराभूत केलं. पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
परंतु आता पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमची (Wasim Akram) प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. पाकिस्तानच्या या माजी कर्णधारानं फॅनकडून विचारलेल्या प्रश्नाला मजेशीर उत्तर दिलं आहे. वसीम अक्रमला एका फॅननं प्रश्न विचारला की, “नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला तर कोण जिंकेल?” यावर वसीम अक्रमनं उत्तर दिलं की, “अरे आम्ही नेपाळला हरवू. परंतु नेपाळचा संघ चांगला आहे. येणाऱ्या काही दिवसात नेपाळचा संघ देखील टी20 क्रिकेटमधील मजबूत संघ असणार आहे.”
पुढे बोलताना वसीम अक्रम (Wasim Akram) म्हणाला, “नेपाळचे अनेक खेळाडू प्रतिभावान आहेत आणि जो दिवस त्यांचा असेल त्या दिवशी ते कोणत्याही संघाला टक्कर देऊ शकतात. परंतु नेपाळ सोबत आमचा सामना झाला तर निश्चितच आम्ही जिंकू. त्यामध्ये काही शंका नाही.”
पाकिस्तानचा संघ अनेक मजबूत संघांमध्ये सामील आहे. परंतु यंदाच्या टी20 विश्वचषकात अमेरिकेनं त्यांना धूळ चारली. पाकिस्तानला 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकादरम्यान अफगाणिस्ताननं धूळ चारली होती. तर 2022च्या टी20 विश्वचषकात झिम्बाब्वे संघानं पाकिस्तानला धूळ चारुन इतिहास रचला होता. त्यामुळेच सर्व फॅन्सला देखील वाटतं आहे की, नेपाळविरुद्धच्या सामन्यात सुद्धा पाकिस्तान संघाचा पराभव होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात घेतला धक्कादायक झेल! मैदानावरील कोणाचाच विश्वास बसेना; VIDEO एकदा पाहाच
‘फादर्स-डे’ च्या दिवशी हार्दिकनं शेअर केला मुलासोबतचा खास व्हिडीओ, पत्नी नताशाकडे दुर्लक्ष
बांग्लादेशनं पुन्हा केली बेईमानी! डीआरएससाठी घेतली ड्रेसिंग रूमकडून मदत; अंपायरचीही साथ मिळाली