भारतात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून ओळखला जातो. कारण या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. आज (15ऑगस्ट, 2022) भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. त्यामुळे भारतभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. परंतु 2 वर्षांपूर्वी अर्थात भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी महान भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी याने क्रिकेटविश्वाला धक्का दिला होता. त्याने या दिवशी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत निवृत्तीची निवृत्तीची घोषणा केली होती.
23 डिसेंबर 2004 ला बांगलादेश विरुद्ध वनडे सामन्यातून धोनीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 530 पेक्षाही अधिक सामने खेळले. तसेच 17 हजांरापेक्षा अधिक धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध जूलैमध्ये खेळला आहे.
धोनीने याआधीच डिसेंबर 2014 ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 6 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे कसोटीत धोनीच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने 2013 मध्ये चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 224 धावांची खेळी केली होती.
तसेच धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारताचा सचिन तेंडूलकर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. धोनीने त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 350 वनडे सामने खेळले असून यात त्याने 10 शतके आणि 73 अर्धशतकांसह 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर भारताकडून धोनीने 98 टी20 सामन्यात 2 अर्धशतकांसह 1617 धावा केल्या आहेत. तो भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
https://www.instagram.com/tv/CD6ZQn1lGBi/?utm_source=ig_web_copy_link
याबरोबरच धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाराही क्रिकेटपटू आहे. त्याने भारताचे 332 सामन्यात नेतृत्व केले आहे. तसेच आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणारा धोनी पहिलाच कर्णधार आहे.
त्याने 2007 मध्ये टी20 विश्वचषक, 2011 मध्ये वनडे विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन स्पर्धांची विजेतेपद कर्णधार म्हणून मिळवली आहेत.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
१५ ऑगस्टला भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांचा लागलाय असा निकाल, फक्त एकदा मिळालाय विजय
स्वातंत्र्य दिन विशेष | सर्व सीमांना भेदत भारतीय महिला खेळाडूंनी जेव्हा जिंकली होती कोट्यवधी मने