---Advertisement---

IPL मध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची एंट्री कधी? जाणून घ्या राहुल द्रविड काय म्हणाले?

---Advertisement---

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 स्पर्धेत आयपीएलच्या मेगा लिलावात 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला 1.1 करोड रुपयांना खरेदी केले होते. तत्पूर्वी त्याला पदार्पण करण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. राजस्थान रॉयल्स संघाचे हेड प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खुलासा केला आहे की, ते या युवा खेळाडूला तयार करत आहेत. जेव्हा गरज पडेल तेव्हा ते त्याला खेळवणार आहेत. आज राजस्थान रॉयल्स संघाचा आयपीएल मधील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. राजस्थान रॉयल्सने पहिले दोन सामने गमावले आहेत, त्यामुळे ते सर्वात खालच्या स्थानी आहेत.

राहुल द्रविड यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की, वैभव सूर्यवंशी प्रभावी खेळाडू आहे आणि आता सध्या तो संघातील खेळाडूंसोबत अनुभव घेत आहे. त्याच्यासोबत तेच होत आहे जे प्रत्येक खेळाडूला तयार करण्यासाठी केलं जातं.

राजस्थान रॉयल्स संघाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की, सध्या तो चांगली ट्रेनिंग घेत आहे. तो एक चांगला आणि प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याचबरोबर बाकीचे खेळाडू सुद्धा चांगले आहेत. आमची जबाबदारी आहे की, आम्ही त्याला चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी तयार करू. त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे. तसेच त्याला सवय लागली पाहिजे आणि त्यामुळे तो खेळाडूंसोबत सराव करत आहे. हा सर्व अनुभव वैभवसाठी खूप चांगला आहे. आम्ही एका खेळाडूला तयार करण्यासाठी ज्या गोष्टींचा पालन करावं लागतं ते सर्व करत आहोत. जर संधी आली तर आम्ही त्याला खेळवण्यापासून घाबरणार नाही.

संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान पराग संघाचे नेतृत्व करत आहे आणि तो तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करत आहे. पण त्याचं स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रदर्शन चांगलं राहिलेलं नाही. त्याने पहिल्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध 4 धावा तसेच दुसऱ्या सामन्यात केकेआर विरुद्ध 25 धावा केल्या होत्या. तरीही राहुल द्रविड यांनी त्याचे या स्थानावर खेळण्याप्रती समर्थन केला आहे.

द्रविड म्हणाले, हे बघा रियान पराग आमच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये एक आहे. आम्हाला त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी देण्याची इच्छा आहे. 20 षटके खूप थोडी वेळ आहे आणि रियान जितके जास्त चेंडू खेळेल तितकेच एका संघाच्या स्वरूपात आमच्यासाठी चांगलं असेल. इमानदारीने बोलायचे झाल्यास, तीन नंबर वर येणे सकारात्मक पाऊल आहे. कारण रियानला फलंदाजी करण्यासाठी जास्त वेळ भेटेल. जर त्याला जास्त वेळ भेटला तर तो जास्त धावा करू शकतो. यामुळे संघाला फायदा होऊ शकतो. मला वाटते की, तो कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करण्यासाठी सक्षम आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---