---Advertisement---

IPL 2025 चं जेतेपद RCB जिंकेल का? विराट कोहलीच्या शानदार फॉर्मनं खेळाचं चित्र बदललं!

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडे या हंगामात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची खूप छान संधी आहे. भारताचा दिग्गज फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजेच विराट कोहली या दिवसात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत विराटने 9 सामन्यांमध्ये 65.33 च्या शानदार सरासरीने 392 धावा केल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत या हंगामात 5 अर्धशतक झळकावले आहेत आणि त्याचा सर्वाधिक स्कोर 73 धावांचा आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीने या हंगामात आत्तापर्यंत 6 सामने जिंकले आहेत आणि त्यांचे 12 गुण आहेत. जर विराट कोहली अशाच फॉर्ममध्ये खेळत राहिला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकू शकतो. आयपीएलमध्ये जिंकलेल्या सामन्यांमध्ये विराटच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने नाबाद 59, 31 67, नाबाद 62 नाबाद 73 आणि 70 धावांची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

आयपीएल 2025 मध्ये विराट खूप शानदार पद्धतीने फलंदाजी करताना दिसत आहे. जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ या हंगामात जे सामने पराभूत झाला त्यामध्ये विराट कोहलीने 7,22,1 धावांचं योगदान दिलं. यामुळे हेच स्पष्ट होत आहे की,जेव्हा एखादा अनुभवी खेळाडू चांगल्या पद्धतीने सतत प्रदर्शन करत असेल तर ते संघासाठी किती फायदेशीर ठरत आहे. याचे एक अजून उत्तम उदाहरण म्हणजे रोहित शर्मा. रोहितने मागील मुंबईच्या दोन सामन्यात अर्धशतक झळकावत मुंबईला शानदार विजय मिळवून दिला आहे.

आयपीएल 2025 मध्ये बंगळूर संघाने सातत्याने चांगलं प्रदर्शन केलं आहे. विराट कोहलीने सुद्धा शानदार कामगिरी करत चांगल्या धावा केल्या आहेत. तसेच बाकी खेळाडूंनी सुद्धा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची भूमिका निभावली आहे. चिन्नास्वामीमध्ये आरसीबीसाठी एक गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे कर्णधार रजत पाटीदार आईपीएल 2025 मध्ये या मैदानावर सलग टॉस पराभूत झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---