त्रिनिदाद येथे वेस्ट इंडीज व भारत यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने सुरुवातीला सामन्यावर पकड बनवत यजमान संघाला 255 धावांवर सर्वबाद केले. यासह भारतीय संघाने पहिल्या डावात 183 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. भारतासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सर्वाधिक पाच बळी मिळवले.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा यजमान संघाने 5 बाद 229 धावा केल्या होत्या. खेळाला सुरुवात झाल्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या संघावर अक्षरशः वर्चस्व गाजवले. या मालिकेत प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून खेळत असलेल्या मोहम्मद सिराज याने पाच पैकी चार बळी आपल्या नावे करत यजमान संघाचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्याने 60 धावा देत पाच फलंदाजांना बाद करून आपल्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याला पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमार व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत साथ दिली. यासह भारताने आपल्या पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतली.
तत्पूर्वी, भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात दमदार फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. विराट कोहली आणि आपल्या कसोटी कारकीर्दीतील 29 वे शतक झळकावत सर्वाधिक योगदान दिले. त्याला यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा व अश्विन यांनी अर्धशतके करत साथ दिली
(WIvIND Mohammad Siraj Fifer Helps India For Take 183 Runs In Trinidad Test)
आणखी वाचा:
पाकिस्तानविरुद्धच्या फायनलची नाणेफेक भारताच्या पारड्यात! टीम इंडिया करणार प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेइंग इलेव्हन
पंचांशी वाद पडला महागात, पुढचे 24 महिने हरमनप्रीतला सावध रहावं लागणार