भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (बीसीसीआय) महिला टी-20 चॅलेंजचे आयोजन करण्याची पुन्हा एकदा तयारी केली आहे. महिला आयपीएल या नावाने ओळखली जाणारी ही स्पर्धा नवी दिल्ली या ठिकाणी 24 ते 30 मे दरम्यान होऊ शकते. आयपीएलच्या 14 व्या हंगामातील प्लेऑफ सामन्यांच्या दरम्यान महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्याचे बीसीसीआयची योजना आहे. परंतु त्यामध्ये अतिरिक्त संघांची भर घालणार की नाही? यावर अजून चर्चा होणार आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आयोजित होण्यार असल्याचे सांगितले जात आहे. आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांमुुळे बीसीसीआयने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार केला होता. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महिला खेळाडूंना वेगळ्या बबलमध्ये ठेवण्यासाठी बीसीसीआय नवीन शहराची निवड करत आहे.
आयपीएल 2021 मध्ये दिल्ली येथे एकूण 8 सामने खेळविण्यात येणार असून शेवटचा सामना 8 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यामुळे महिलांना टी-20 चॅलेंज स्पर्धेचे सामने दिल्लीत आयोजण्यात कसलीही समस्या उद्भवणार नाही. तसेच महिला खेळाडूंना आपला क्वारंटाईन काळ दिल्लीतच पूर्ण करावा लागणार असून सामन्याच्या सराव तसेच इतर गोष्टींसाठी दिल्लीतच सुविधा पुरविल्या जातील. महिला स्पर्धा वाढविण्याचा बीसीसीआय विचार करीत असून यात आणखी एक संघाचा समावेश असू शकतो.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना एका अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की, “स्पर्धा वाढविण्याची कल्पना आहे, परंतु कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे ही वेळ कदाचित योग्य नाही. या वेळीही सर्व गुंतागुंत असूनही तीनच संघ ठेवणे हा एक उत्तम पर्याय म्हणून पाहिले जात आहे.”
आतापर्यंत महिला टी-20 चॅलेंजमध्ये वेग, ट्रेलब्लाझर आणि सुपरनोव्हास हे संघ आहेत. या स्पर्धेची आत्तापर्यंत तीन सत्रे खेळली गेली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
म्हणून दिलीप वेंगसरकरांना म्हटलं जातं ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’; गावसकर-सचिनलाही तोडता आला नाही विक्रम