भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी (Test Series Against Sri Lanka) त्याची निवड केली गेलेली नाही. यानंतर त्याने भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच एका पत्रकाराने त्याला मुलाखत देण्याची धमकी दिल्याचे प्रकरणही चर्चेत आहे.
याच साहाच्या काळात एमएस धोनी (MS Dhoni)सारखा यष्टीरक्षक फलंदाज संघात असल्याने त्याच्याबरोबरच दिनेश कार्तिक, पार्थिव पटेल अशा यष्टीरक्षकांची कारकिर्द कठीण राहिली आहे. एकदा साहाने धोनीमुळे त्याला फार कमी संधी मिळाल्याचा (Wriddhiman Saha On MS Dhoni) पश्चाताप व्यक्त केला होता.
साहाने २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रतिकूल परिस्थितीत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कारण त्याला कसोटी पदार्पणाच्या काही मिनिटांपूर्वीच तो खेळणार असल्याची माहिती दिली गेली होती. २०२१ साली एका मुलाखतीत बोलताना साहाने मान्य केले होते की, तो फक्त एक पर्यायी खेळाडू म्हणून भारताच्या कसोटी संघाचा भाग राहिला आहे. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला किंवा कोणत्या अन्य कारणामुळे तो सामना खेळू शकला नाही, तरच साहाला संघात जागा दिली जायची.
धोनीला दुखापती झाल्यानंतरच मिळाल्या संधी
साहाने म्हटले होते की, जेव्हा माही भाई कसोटी संघाचा भाग होता, तेव्हा सर्वांना माहिती होते की, तो प्रत्येक सामन्यात खेळणार आहे. तरीही मी मला मिळणाऱ्या प्रत्येक संधीसाठी तयार असायचो. माझे कसोटी पदार्पणही अशाच स्थितीत झाले होते. मला आधी सांगितले गेले होते की, मी खेळणार नाही. नंतर अचानक मला खेळावे लागले होते.
माही भाई कसोटी संघात असताना मी जितकेही सामने खेळले होते, ते सर्व त्याला दुखापती झाल्यानंतरच खेळू शकलो होतो. २०१२ मध्ये निलंबनानंतर मला दुसरी कसोटी खेळायला मिळाली होती. मला फक्त एका कव्हरच्या (Wriddiman Saha Used As Cover For Injured Player) रूपात संधी मिळत गेल्या, असेही तो पुढे म्हणाला.
साहाला २०१४ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचा तिसरा कसोटी कसोटी तेव्हा खेळायला मिळाला होता, जेव्हा धोनी दुखापतीमुळे कसोटी संघातून बाहेर झाला होता. ती कसोटी मालिका धोनीच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका ठरली. त्यानंतर धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र धोनीच्या निवृत्तीनंतरही साहाला सतत संघातून आत-बाहेर होत राहावे लागले आहे. त्याने आतापर्यंत भारताकडून फक्त ४० कसोटी सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ मधील तब्बल ७० सामने होणार मुंबई अन् पुण्यात? ‘या’ ४ स्टेडियमवर आयोजनाची शक्यता