वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताला 12 जुलै पासून खेळायचा आहे. भारताला या वेस्ट इंडीज दौऱ्यात एकूण 10 सामने खेळायचे आहेत, त्यापैकी दोन सामने हे कसोटी असतील. पण कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडताना यावेळी संघ व्यवस्थापनापुढे मोठा पेच असणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज (West Indies Vs India 1st Test) यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमनिकामध्ये खेळला जाईल. या सामन्यात भारतासाठी रोहित शर्मासह सलामीला कोणता फलंदाज खेळणार, हा नवा प्रश्न तयार झाला आहे. सलामीवीर म्हणून शुबमन गिल आणि रोहित शर्मा ही जोडी निश्चित आहे. मागच्या मोठ्या काळापासून या दोघांनीच भारतासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. मात्र, या मालिकेत या ठिकाणी बदल होऊ शकतो.
शिखर धवन कसोटी संघातून बाहेर झाल्यानंतर भारताला अद्याप एकही डाव्या हाताचा सलामीवीर मिळाला नाही. या मालिकेत डावखुरा यशस्वी जयस्वाल भारतीय संघाचा भाग असून, भविष्याचा विचार करता त्याला सलामीवीर म्हणून पाहिले जाऊ शकते. गिल कसोटी सलामीवीर म्हणून भारताबाहेर अद्याप तितकासा यशस्वी ठरला नाही. डावी-उजवी जोडी म्हणून रोहितसह यशस्वीला संधी मिळू शकते. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराची जागा रिक्त असल्याने त्या ठिकाणी गिल आपला दावा करू शकतो. त्यानंतर विराट कोहली व अजिंक्य रहाणे भारतीय फलंदाजी मजबूत बनवतील.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताची संभावित प्लेइंग 11 –
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज
(Yashasvi Jaiswal Might Be Debute Against West Indies In Test As Opener)