तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात झिम्बाब्वेने बांगलादेशचा १० धावांनी पराभव केला. या विजयासह झिम्बाब्वेने मालिका २-१ अशी जिंकली आहे. यासह झिम्बाब्वेने इतिहास रचला आहे. क्रेग एर्विनच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाने बांगलादेशविरुद्धची पहिली टी-२० मालिका जिंकण्यात यश मिळवले आहे. याआधी झिम्बाब्वेचा संघ बांगलादेशविरुद्ध कधीही टी-२० मालिका जिंकू शकला नव्हता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने २० षटकांत ८ गडी गमावून १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ८ बाद १४६ धावाच करू शकला. अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी १८ धावांची गरज होती, मात्र संघाला १० धावाच करता आल्या.
१५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या ३४ धावांवर संघाने आपले तीन विकेट गमावल्या. लिटन दास ६ चेंडूत १३ धावा, परवेझ ६ चेंडूत २ धावा आणि यष्टिरक्षक अनामूल हक १३ चेंडूत १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. महमुदुल्लाहने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही २७ चेंडूत २७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अफिफ हुसैन २७ चेंडूत ३९ धावा करून नाबाद राहिला. मेहंदी हसनने १७ चेंडूत २२ धावा केल्या. व्हिक्टर न्युचीने तीन आणि ब्रॅड इव्हान्सने दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, झिम्बाब्वेने २० षटकांत ८ गडी गमावून १५६ धावा केल्या होत्या. चकाबवा आणि एविन यांनी पहिल्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर काही षटकांतच संघाची मधली फळी ढासळली. झिम्बाब्वेने १० धावांत चार विकेट गमावल्या. रायन बुर्ले आणि एल जोंगवे यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे झिम्बाब्वेने दीडशेचा टप्पा ओलांडला. रायननेही अर्धशतक ठोकले. शुक्रवारपासून दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अर्शदीप ठरतोय भारतासाठी सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू, वाचा आकडेवारी
‘आता कोहलीने जास्तीत जास्त सामने खेळावेत, तरचं…’ भारताच्या माजी दिग्गजाचा विराटला सल्ला
CWG 2022। उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडिया सज्ज! फक्त करावी लागेल ‘ही’ एक कामगिरी