---Advertisement---

मुंबईकर पृथ्वी शाॅची जाळ आणि धुर खेळी, षटकार- चौकारांची बरसात

---Advertisement---

इंदोर | सईद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई विरुद्ध गोवा सामन्यात मुंबईने ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्यात मुंबईकडून सलामीवीर पृथ्वी शाॅने तुफानी फलंदाजी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

गोव्याने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांना २० षटकांत ४ बाद १४० धावांपर्यंतच मजल मारता आली. ३८ धावा करणारा अमोघ देसाई गोव्याकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

यानंतर १४१ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या मुंबई संघाच्या सलामीरांनी ११.१ षटकांत ९१ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने २५चेंडूत ३१ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर पृथ्वी शाॅने सुर्याकुमार यादवबरोबर संघाला विजयाच्या समीप नेले.

पृथ्वी शाॅने आजच्या खेळीत ४७ चेंडूत ७१ धावा करताना ७ षटकार आणि ५ चौकारांची बरसात केली. गेले तीन सामने शाॅला सईद मुश्ताक अली स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्याने ०, ८ आणि १० धावांची खेळी केली होती.

परंतु आज मात्र या युवा प्रतिभावान खेळाडूला जबरदस्त सुर गवसला.

या स्पर्धेत मुंबईने ४ पैकी ४ विजय मिळवले आहेत. १६ गुणांसह ते क गटात अव्वल स्थानी आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment