क्रिकेटच्या मैदानात दोन व्यक्त सर्वात महत्वाची भूमिका पार पाडतात. एक म्हणजे संघाचा प्रशिक्षक आणि दुसरा म्हणजे संघाचा कर्णधार. संघ मैदानात खेळत असताना कर्णधार त्यांचे नेतृत्व करत असतो, तर मैदानाबाहेर कर्णधारासह सर्वजण प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेत असतात. प्रशिक्षकांच्या सर्व योजना मैदानात प्रत्यक्षपणे उतरवणारा कर्णधारच असतो. तसे पाहिले, तर कर्णधाराची भूमिका काही प्रमाणात जास्तच महत्वाची दिसते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक कर्णधार असे होऊन गेले आहेत, ज्यांनी संघासोबत चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाला तसेच आशियातील इतर काही संघांना देखील अशा प्रकारचे कर्णधार मिळाले आहेत. अनेकदा या कर्णधारांना पराभवानंतर टीकांना सामना करावा लागतो. तसेच जेव्हा संघ विजय मिळतो, तेव्ह सर्वात जास्त कौतुक देखील कर्णधाराचेच होत असेत. आपण या लेखात आशिआई क्रिकेटमधील हुशार कर्णधारांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी स्वतःच्या संघासाठी मोठे योगदान दिले आहे.
आशियाई क्रिकेटमधील दोन हुशार कर्णधार
अर्जुन रणतुंगा
एक चांगला आणि हुशार कर्णधार संघात सुधारणा करू शकतो आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम प्रदर्शन देखील करून घेऊ शकतो. हाच गुण माजी श्रीलंकन दिग्गज अर्जुन रणतुंगा (Arjun Rantunga) यांच्यामध्येही होता. संघासोबत नेहमी उभे राहणारे रणतुंगा मोठा खाळ श्रीलंकेचे कर्णधार राहिले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो अधिकच चतुराईने नेतृत्व करत असायचा. त्याच्याच नेतृत्वात सनथ जयसूर्या सलामीसाठी खेळू लागला आणि पुढे जाऊन श्रीलंकेचा महान सलामीवीर देखील बनला. तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांना योग्य वेघी गोलंदाजीला पाठवण्याची कलाही त्याला चांगलीच अवगत होती. त्याच्या या नेतृत्वगुणांमुळेच रणतुंगा कर्णधार असताना श्रीलंकन संघाने एक विश्वचषक देखील जिंकला.
एमएस धोनी –
भारतीय दिग्गज एमएस धोनी (MS Dhoni) कर्णधाराच्या रूपात एका वेगळ्याच उंचीवर आहे. त्याने भारतासाठी एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तिन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहेत. मैदानात धोनीने डीआरएस घेतल्यानंतर पंचांना देखील निर्णय देण्यापूर्वी विचार करावा लागत असायचा कारण, त्याचा अंदाज अनेकदा बरोबरच असायचा. धोनीचे कर्णधारपद हे भारतीय क्रिकेटचा एंकदरीत इतिहासातील एक सुवर्णकाळ, असेही आपण म्हणू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी सध्या खेळत नसला, तरी आयपीएलमध्ये तो अजूनही खेळत आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जिंकलो रे! भारताने श्रीलंकेला लोळवलं, उंचावली महिला आशिया चषकाची सातवी ट्रॉफी
‘टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतच जिंकेल’, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी