---Advertisement---

कोरोनामुळे निधन झालेल्या भारताच्या पहिल्या ‘वॉल’ बद्दल फारशा माहिती नसलेल्या १० गोष्टी

On: सोमवार, ऑगस्ट 17, 2020 11:34 AM
---Advertisement---

मुंबई । भारतीय संघाचे माजी सलामीवीर चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 73 वर्षांचे होते. चौहान गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. शनिवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती, त्यानंतर त्यांना लखनऊच्या पीजीआयमधून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या एक महिन्यापासून कोरोना इन्फेक्शनने ग्रस्त असलेल्या चौहान यांना मूत्रपिंडाचा त्रास होत होता आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. क्रिकेट कारकीर्दीत चौहान यांनी खेळाडू ते कोचपर्यंत प्रत्येक भूमिका निभावली.

कसोटीत सर्वाधिक धावा – शेन वॉर्ननंतर शतक न करता कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम चेतन चौहानच्या नावावर आहे. त्यांनी 40 कसोटी सामन्यांमध्ये 2084 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 97 आहे. त्यांनी 16 अर्धशतके ठोकली आहेत. ते दोनवेळा ‘नर्वस नाइन्टीज’ चे शिकार ठरले.

कसोटी कारकीर्द चौकार आणि षटकारांसह सुरू झाली – चेतन चौहान यांनी 1969 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत पदार्पण केले. खाते उघडण्यासाठी चेतन चौहानने 25 मिनिटे घेतली. यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीस चौकारांसह प्रारंभ केला आणि पुढच्याच चेंडूवर षटकार ठोकला.

सुनील गावस्कर सोबत भागीदारी –  चेतन चौहान आणि सुनील गावस्करची जोडी खूपच यशस्वी ठरली. दोघांनीही 60 डावांमध्ये 54.85 च्या सरासरीने 3127 धावा केल्या. सलामीला खेळताना या दोघांनी 11 शतकी भागीदारी केली आहे. 1979 मध्ये ओव्हल कसोटीत दोघांमध्ये 213 धावांची सलामीची भागीदारी रचली. त्यावेळी गावस्कर आणि चेतन चौहानची जोडी तिसर्‍या क्रमांकाची यशस्वी जोडी होती.

कसोटी कारकीर्दीचा शेवट – 1980-81 मध्ये भारताचा न्यूझीलंड दौरा हा चेतन चौहानचा अखेरचा दौरा होता. यानंतर, त्यांना संधी मिळाली नाही. तथापि, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याने 41.50 च्या सरासरीने धावा केल्या. तथापि, पुढील मालिकेपूर्वी त्यांना वगळण्यात आले आणि ते पुन्हा कसोटी संघात परतले नाहीत.

कोचिंगला केली सुरुवात – 1980 च्या दशकात चेतन चौहान  प्रशिक्षक आणि खेळाडू म्हणून एडिलेट क्लबमध्ये सामील झाले. त्यांनी ते काम तीन वर्षे केले. त्यावेळी भारतातील खेळाडूंना चांगले पैसे मिळाले नव्हते. पण चौहान यांना ऑस्ट्रेलियामध्ये चांगले पैसे मिळाले होते.

राजकारणाची सुरुवात- चेतन चौहाननी 1985 मध्ये शेवटचा सामना खेळला. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नवीन डाव सुरू केला. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले.

भारतीय संघाचे व्यवस्थापक- चेतन चौहान सर्वाधिक वेळा भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. ते व्यवस्थापक असताना, ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वपूर्ण मालिका खेळली. 2000 मध्ये संघाचे व्यवस्थापक असताना भारताने ईडन गार्डन्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळविला.

डीडीसीए सोबत केले काम – चेतन चौहान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर डीडीसीएच्या उपाध्यक्षपदाची सूत्रेही घेतली. त्याचबरोबर ते यापूर्वी दिल्ली संघाचे प्रशिक्षकही होते. ते ‘बोर्ड ऑफ वेटरन क्रिकेट’चे प्रमुखही राहिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---