नवी दिल्ली | इंडियन प्रीमियर लीग 2020 हा इतिहासातील सर्वात रोमांचक हंगाम आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी संघांना साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागली. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याकरिता चौथ्या स्थानासाठी 3 संघ शर्यतीत होते. मात्र, यामध्ये सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली. तथापि आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की या हंगामात हैदराबादच्या बाबतीत 3 योगायोग जुळून आले आहेत. त्यामुळे हा संघ पुन्हा एकदा जेतेपद पटकावणार अशीच चर्चा आहे.
आयपीएलमधील साखळी फेरीतूनच जवळपास बाहेर पडण्याच्या स्तिथीत असलेल्या हैदराबादने सलग 3 सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आले.प्ले ऑफमध्ये झालेल्या एलिमिनेटर सामन्यात हैद्राबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव केला. या विजयासह हैदराबादच्या किताब पटकावण्याच्या आशा मजबूत झाल्या आहेत.
या हंगामात हैदराबाद आहे सन 2016 च्या विजयीमार्गांवर
विशेष म्हणजे सन 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने नाट्यमय मार्गाने विजेतेपदाचा प्रवास केला होता. 2016 मध्येही हैदराबाद संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सलग 4 सामने जिंकण्याची गरज होती, त्यानंतर त्यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवून विजेतेपद जिंकले होते.
त्याचबरोबर आयपीएल 2020 मध्ये हैदराबादचा प्रवासही असाच होता. साखळी फेरीत या संघाने सलग 3 सामने जिंकून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते. आता या संघाने एलिमिनेटर सामन्यात बेंगलोरला पराभूत केले आहे.
वॉर्नरने सर्वाधिक वेळा जिंकला टॉस
हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आयपीएलच्या या हंगामात टॉसचा बॉस म्हणून उदयास आला आहे. या हंगामात झालेल्या 15 सामन्यांत त्याने 11 वेळा टॉस जिंकला आहे. यापूर्वी हा पराक्रम फक्त कर्णधार रोहित शर्मा आणि एमएस धोनीने केला होता.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सन 2017 मध्ये 11 वेळा टॉस जिंकला होता, तर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीनेही 2018 मध्ये 11 वेळा टॉस जिंकला होता. इतकेच नव्हे, तर आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत ज्या कर्णधाराने सर्वाधिक नाणेफेक जिंकले आहे त्या कर्णधाराने विजेतेपद पटकावले आहे.
गुणतालिकेत तिसरा क्रमांक
सनरायझर्स हैदराबाद संघाने जेतेपद जिंकण्यासाठी आणखी एक योगायोग जुळून आला आहे. शुक्रवारी (6 नोव्हेंबर) झालेल्या एलिमिनेटर सामन्यात हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव करून प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासात पाचव्यांदा एलिमिनेटर सामना खेळला. त्यांनी साखळी फेरीनंतर गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला होता. याआधी 2016 ला जेव्हा त्यांनी आयपीएल विजेतेपद मिळवले होते, तेव्हाही ते साखळी फेरीनंतर गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावरच होते.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नरने RCB विरुद्ध केवळ १७ धावा करुनही मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम
“थँक्यू विराट”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे विराटची ट्विटरवर उडतेय खिल्ली
लवकरच भेटू! IPL मधील आव्हान संपल्यानंतर विराट कोहलीचे खास ट्विट
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा