आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक कर्णधार झालेत, ज्यांनी आपल्या कारकीर्दीत संघाला विश्वविजेता बनवले. मागच्या काही दशकांमध्ये आपण ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँन्टिग, भारताचा एमएस धोनी आणि पाकिस्तानचा इमरान खान सारख्या कर्णधारांना पाहिले आहे. रिकी पाँन्टिग आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरूपामधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. तसेच, कॅप्टनकूल एमएस धोनीने वनडे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय विश्वचषकमध्ये भारताला चॅम्पियन बनवले आहे.
या दरम्यान काही कर्णधार असेही झालेत, ज्यांनी खूप काळ कर्णधाराची भूमिका निभावली. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तेवढे यशस्वी ठरले नाहीत. आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अशाच तीन कर्णधारांबद्दल सांगणार आहोत.
१. माहेला जयवर्धने
श्रीलंकाचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेला २००६ साली आईसीसीने वर्षातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराच्या सन्मानाने पुरस्कारित केले होते. परंतु याच जयवर्धनेच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाला आईसीसी विश्वचषक २००७ साली अंतिम सामन्यामध्ये रिकी पाँन्टिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाकडून मात मिळाली होती.
यानंतर लगेगच, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कर्णधारपदामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आणि यष्टीरक्षक-फलंदाज कुमार संगकारा याला संघाच्या कर्णधारापदाची जबाबदारी सोपवली. तसेच, २०११ विश्वचषकामध्ये त्यांनी वनडे स्वरूपातून उप-कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
२. इंजमाम उल हक
इंजमाम उल हक हे पाकिस्तानचे एकमेव कर्णधार आहेत, ज्यांच्या नेतृत्वामध्ये २००७ साली टी-२० विश्वचषकामध्ये पाकिस्तानला पराभवाला तोंड द्यावे लागले. ते आपल्या सर्वात मोठ्या समर्थक प्रशिक्षक बॉब वुल्मर च्या रहस्यमयी मृत्युनंतर असुरक्षित स्थितीमध्ये फसलेले होते.
भारत-पाकिस्तान संघातील अंतिम सामन्यातील पाकिस्तानच्या पराभवानंतर पीसीबीने त्यांच्याकडून कर्णधारपद काढून घेतले होते. पीसीबीने इंजमाम उल हकनंतर संघाच्या अनुभवी खेळाडू शाहिद आफ्रिदीला पुढे कर्णधारपद सोपवले होते.
३. केन विलियमसन
साल २०१९ क्रिकेट विश्वचषकामधील न्यूजीलंडचा कर्णधार केन विलियमसनची एक चूक कोणी विसरू शकत नाही. केन विलियमसन न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करत होता आणि ही दुसरी वेळ होती, जेव्हा न्यूजीलंड विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत होता. सुपर ओवरमध्ये पुन्हा उभय संघात बरोबरी झाल्यानंतर सर्वाधिक बाउंड्रींच्या आधारावर सामन्याचा विजेता घोषित करण्यात आला आणि इंग्लंडने ट्रॉफी जिंकली, कारण त्यांच्या फलंदाजांनी अधिक बाउंड्री मारल्या होत्या. तसेच, २०२१ सालीच्या आईसीसी टी-२० विश्वचषकामध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियाने न्यूजीलंडचा दारुण पराभव केला होता. अशावेळी केन विलियमसनच्या वाईट नशीबामुळे न्यूजीलंडने आपल्या दोन्ही विश्वविजेता बनवण्याच्या संधी गमवल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लंबूजी! क्रिकेटच्या मैदानावर ‘या’ खेळाडूंच्या उंचीचीच रंगते चर्चा, ‘टॉप’ला फक्त पाकिस्तानी क्रिकेटर
कटकमध्ये भारत-दक्षिण आफ्रिेकेचे खेळाडू चाखणार ‘या’ पदार्थांची चव, पाहा मेन्यू