सध्या सर्वत्र टी-२० विश्वचषकाची चर्चा सुरू आहे. विश्वचषकातील सुपर १२ फेरीला सुरुवात झाली आहे आणि स्पर्धा रोमांचक होत चालली आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीला चाहत्यांना काही मोठे सामने पाहायला मिळाले आहेत. तसेच आगामी काळातही अनेक रोमांचक सामने चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. भारताने त्याच्या विश्वचषकातील अभियानाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने सुरुवात केली आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभवाची धूळ चारली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या शाहीन शाह अफ्रिदीने जबदरस्तत गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात भारतीय संघाचे महत्वाचे तीन विकेट्स गेतले आणि सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सामनावीर म्हणून निवडला गेलेला सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.
आपण या लेखात अशाच तीन खेळाडूंविषयी माहिती घेणार आहोत, ज्यांनी टी-२० मध्ये सर्वात कमी वयात भारताविरुद्ध सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
सर्वात कमी वयातील ३ खेळाडू ज्यांनी भारताविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकला
३. एंजेलो मॅथ्यूज (श्रीलंका) वय – २२ वर्षे आणि ३४३ दिवस
श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू एंजेलो मॅथ्यूज आज त्याच्या कारकिर्दीच्या उतारावर आहे. असे असले तर, त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा संघासाठी महत्वाची खेळी केली आहे. त्याने संघासाठी क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले आहे. त्याचे नाव मागच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंमध्ये घेतले जायचे.
त्याने २०१० साली टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध एका सामन्यात ३७ चेंडूत ४६ धावांची खेळी केली होती आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली होती. तसेच गोलंदाजी करताना त्याने ३ षटकांमध्ये २९ धावा दिल्या होत्या. या सामन्यात त्याला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शननासाठी सामनावीर निवडले गेले होते. त्यावेळी त्याचे वय २२ वर्षे ३४३ दिवस होते.
२. कसुन रजिंथा (श्रीलंका) वय – २२ वर्षे आणि २५३ दिवस
श्रीलंकेचा कसुन रजिथाने त्याच्या राष्ट्रीय संघासाठी जास्त सामने खेळले नाहीत आणि तो सथ्या श्रीलंका संघातून बाहेर आहे. असे असले तरी, त्याने भारताविरुद्धच्या एका सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले होते. रजिथाने त्याच्या टी-२० कारकिर्दीत एकूण १० विकेस्ट घेतले आहे, पण त्याने त्याच्या भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.
त्याने २०१६ मध्ये भारतासोबतच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांचे विकेट्स घेतले होते. त्याच्या गोलंदाजीच्या जोराबत श्रीलंकेने भारताला अवघ्या १०१ धावांवर रोखले. त्याला या सामन्यात सामनावीर निवडले गेले होते. त्यावेळी तो २२ वर्षे २५३ दिवसांचा होता.
१. शाहीन शाह अफ्रिदी (पाकिस्तान) वय – २१ वर्ष आणि २०१ दिवस
पाकिस्तान संघाची टी-२० विश्वचषक २०२१ ची सुरुवात खूपच उत्कृष्ट झाली आहे. त्यांनी यावर्षी विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा पराभव केला आहे. या सामन्यात पाकिस्तान संघासाठी भारताला पराभूत करणे एवढे सोपे नव्हते, पण त्यांचा युवा गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदीने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताला जास्त धावा करण्यापासून रोखले.
त्याने रोहित शर्मा, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे भारताचे तीन महत्वाचे विकेट्स घेतले आणि पाकिस्तानच्या विजयाचा मार्ग सोपा केला. त्याच्या या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्याला सामना संपल्यानंतर सामनावीर निवडले गेले. त्यावेळी तो २१ वर्षे २०१ दिवस इतक्या वयाचा होता. तो सर्वात कमी वयात भारताविरुद्ध सामनावीर निवडला गेलेला खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
डी कॉकच्या संघाबाहेर होण्याच्या निर्णयावर कर्णधाराचे मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
कोरोनाचा पुन्हा कहर! मुश्ताक अली ट्रॉफीपूर्वी मुंबईचे चार महत्त्वाचे खेळाडू पॉझिटिव्ह
‘केवळ विजयातच नाही पराभवातही संघाला पाठिंबा द्या’; विश्वविजेत्या खेळाडूचे भारतीय समर्थकांना आवाहन