---Advertisement---

ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला नडणारे ४ भारतीय कर्णधार

---Advertisement---

आस्ट्रेलियामध्ये आजपर्यंत १० संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामने खेळले. ऑस्ट्रेलियात कसोटी विजय मिळवणं तसं पहिल्यापासूनच कठीण. त्याचमुळे या १० पैकी केवळ ३ संघांना ऑस्ट्रेलियात १० पेक्षा जास्त विजय मिळवता आले आहेत.

इंग्लंड (५७), वेस्ट इंडिज (१८) व दक्षिण आफ्रिका (१०) या संघांनी हे विजय मिळवले आहेत. भारतीय संघ या देशात ४८ कसोटी सामने खेळला असून त्यात ७ विजय, २९ पराभव व १२ सामने अनिर्णित अशी भारताची कामगिरी राहिली आहे.

या ४८ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व हे १३ कर्णधारांनी केले. त्यात केवळ ५ कर्णधारांना येथे कसोटी सामने जिंकण्यात यश मिळाले. 4 Indian Captain to Win Test Match in a Australia.

४. सुनिल गावसकर (१ कसोटी विजय)

सुनिल गावसकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यात पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर तिसरा सामना भारताने जिंकला. दुसरा सामना अनिर्णित राहिला.

३. सौरव गांगुुली (१ कसोटी विजय)

२००३-०४मध्ये गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने ४ कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यात भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. यातील पहिला व  चौथा सामना अनिर्णित राहिला तर दुसऱ्या सामन्यात भारताने तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

२. विराट कोहली (२ कसोटी विजय)

२०१४-२०१५मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामने खेळले परंतु यातील पहिल्या व चौथ्या कसोटीत विराटने संघाचे नेतृत्त्व केले. यातील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. तर  चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर २०१८-१९मध्ये विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ परत ऑस्ट्रेलियाला ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी गेला. यातील पहिला व तिसरा सामना भारताने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला.

१. बिशनसिंग बेदी (२ कसोटी विजय)

बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने १९७७-७८मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ५ कसोटी सामने खेळले. यातील तिसऱ्या व चौथ्या कसोटीत भारताने शानदार विजय मिळवले. परंतु बाकी ३ कसोटीत पराभवामुळे मालिका ३-२ अशी पराभूत झाले. बेदी हे ऑस्ट्रेलियात २ कसोटी सामने जिंकणारे पहिले भारतीय कर्णधार आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकणारे ३ भारतीय कर्णधार

भारतात एकही कसोटी सामना न जिंकणारे ३ महान कर्णधार

एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज

-२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं

-सचिनला आऊट झाला की हा खेळाडू करायचा रडायला सुरुवात

-आणि युवराजने बसमधील सिटवर बसलेल्या रोहितला उठवले

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---