चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रतिस्पर्धी संघांमध्ये अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळते. त्यामुळेच चाहते या स्पर्धेसाठी खूप उत्सुक असतात. तर आता ही स्पर्धा पुन्हा एकदा आयोजित केली जाणार आहे. यांदाची 2025 ची स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानमध्ये होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान भारत पाकिस्तानात जाणार का नाही यावर अद्याप अधिकृत कोणताही निर्णय समोर आलेला नाही.
टीम इंडियाने शेवटचे 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. तर 2017 मध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र पुन्हा एकदा आता टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत अनेक भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. तर या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला त्या 5 भारतीय गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
5. इशांत शर्मा
2013 मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करणारा इशांत शर्मा या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. इशांतने 7 सामन्यात 23.84 च्या सरासरीने 13 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान 33 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. भुवनेश्वर कुमारनेही 13 विकेट घेतल्या आहेत पण त्याची गोलंदाजीची सरासरी इशांतपेक्षा जास्त आहे.
4. हरभजन सिंग
भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग या यादीत चौथ्या स्थानावर आहे. भज्जीने आपल्या करिअरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 13 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 3.96 च्या इकॉनॉमी रेटने धावा देत 35.42 च्या सरासरीने 14 बळी घेतले. ज्यामध्ये भज्जीची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 27 धावांत 3 बळी राहिली.
3. सचिन तेंडुलकर
या यादीत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे नाव अनेक चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकते. तेंडुलकर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा बॅट आणि बॉलवर आपले कौशल्य दाखवण्यात पटाईत होता आणि त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भरपूर यश मिळवले. या दिग्गज खेळाडूने 16 सामन्यात 14 बळी घेण्याचा पराक्रम केला.
2. झहीर खान
टीम इंडियासाठी दीर्घकाळ वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावणारा झहीर खान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत भारतासाठी दुसऱ्या स्थानावर आहे. झहीरने 9 सामन्यात 15 बळी घेतले आणि 45 धावांत 4 विकेट्स घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
1. रवींद्र जडेजा
डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. 2013 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताला ट्रॉफी जिंकून देण्यात जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या नावावर 10 सामन्यात 16 विकेट्स असून एका डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्याने केला आहे.
हेही वाचा-
हॉकीमध्ये ‘पंजा’ पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, आज यजमान चीनविरुद्ध विजेतेपदाचा सामना
युरोपियन मुलींमध्ये नीरज चोप्राची ‘क्रेझ’, सेल्फीसोबत नंबर मागितला! VIDEO
8 षटकार आणि विश्वविक्रम; बांग्लादेशविरुद्ध कसोटीत स्टार खेळाडूला इतिहास रचण्याची संधी