कोणत्याही खेळात कर्णधार आणि खेळाडू यांच्यात समन्वय असणे खूप महत्वाचे आहे. कारण कर्णधार संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि संघाच्या चांगल्या किंवा वाईट कामगिरीवर त्याची संपूर्ण जबाबदारी असते.
पण कर्णधार आणि खेळाडू यांच्यातील परस्पर वादही बऱ्याचदा पाहायला मिळाले आहेत. ज्यामुळे अनेकदा त्याचा त्रास खेळाडूला सहन करावा लागतो. जर एखाद्या खेळाडूचे कर्णधार आणि क्रिकेट बोर्डाशी संबंध चांगले नसल्यास त्या खेळाडूच्या कारकीर्दीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आज या लेखात अशाच काही खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. ज्यांचे नाते कर्णधार आणि क्रिकेट बोर्डाशी चांगले नाहीत, त्यामुळे त्या खेळाडूची कारकीर्द नष्ट झाली. त्यामुळे त्या खेळाडूला निवृत्ती घेण्याची नामुष्की आली.
या यादीमध्ये पाच खेळाडूंचा समावेश आहे जे त्यांच्या काळात अत्यंत प्रतिभावान खेळाडू होते. पण कर्णधार आणि क्रिकेट बोर्डाशी असलेल्या परस्पर मतभेदामुळे त्या खळाडूंनी वेळेआधीच क्रिकेटला निरोप दिला.
५. केविन पीटरसन (Kevin Pietersen)
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज केविन पीटरसनही या यादीत आहे. कर्णधार आणि क्रिकेट बोर्डाशी झालेल्या मतभेदामुळे केविन पीटरसनची कारकीर्द ही लवकर संपली. कारकीर्दीच्या शेवटी, त्याचा इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी वाद बऱ्याच प्रमाणात वाढला. ज्याचा परिणाम पीटरसनच्या कारकिर्दीच्या झाला आणि तो वाद त्याने निवृत्ती घेतल्यावर संपला.
पीटरसनचा बोर्डशी वाद हा २०१३-१४ च्या अॅशेस मालिकेदरम्यान झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडच्या संघाला अत्यंत वाईट पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर बोर्डाने त्याला संघातून काढून टाकले. त्यावेळी बोर्डाने कारण असे सांगितले की संघात आता युवा खेळाडूंना खेळायची संधी द्यायची आहे. ज्यामुळे आता वरिष्ठ खेळाडूंना वगळले गेले आहे.
पण माध्यमांच्या वृत्तानुसार पीटरसनचा वाद कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अॅन्डी फ्लॉवर यांच्याशी होत असल्याचे नंतर उघडकीस आले. ज्यामुळे त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
४. अंबाती रायुडू (Ambati Rayudu)
या यादीमध्ये चौथे नाव भारतीय खेळाडू अंबाती रायुडूचे आहे. कर्णधार विराट कोहली आणि बोर्डाबरोबर असलेल्या मतभेदामुळे त्याची कारकीर्द संपल्याचे म्हटले जाते. रायुडूने बोर्डाशी बर्याच वेळा वाद घातला आहे. तो कधीही संघाचा नियमित सदस्य झाला नाही.
२०१९ विश्वचषकापूर्वी कित्येक सामन्यात तो भारतीय संघाचा नियमित सदस्य होता. तो विश्वचषक २०१९ च्या सामन्यामध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा प्रबळ दावेदार होता, परंतु त्याची संघात निवड झाली नव्हती. अनेक जाणकारांच्या म्हणण्यानुसार त्याची निवड झाली पाहिजे होती.
रायुडूने या निवडीवर नाराजी दाखवत टीम मॅनेजमेंटवर थ्रीडी चष्माद्वारे खेळाडूची कामगिरी पाहिल्याचा आरोप केला. त्यामुळे कर्णधार आणि बोर्ड त्याच्यावर संतापले. याचा परिणाम म्हणून विजय शंकर विश्वचषकादरम्यान जखमी झाल्यानंतरही रायुडूकडे दुर्लक्ष करून रीषभ पंतची निवड केल्याची शक्यता आहे. यानंतर रायुडूनेही जुलै २०१९ मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण नंतर त्याने ही निवृत्ती मागेही घेतली पण त्याला अजून भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.
३. शोएब अख्तर (Shoaib Akhtar)
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा त्याच्या वेगवान गोलंदाजीबद्दल बोललं तर जातच, परंतु कर्णधार आणि बोर्ड यांच्यातील वाद याबद्दलही चर्चा होते.
असे म्हणतात की त्याने ज्या प्रकारे आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजाला त्रास दिला, अशाच प्रकारे तो स्वत: क्रिकेट बोर्डाशी झालेल्या वादामुळे अस्वस्थ दिसत होता. त्याचा फटका त्याला स्वत: भोगावा लागला आणि म्हणूनच त्याला वेळेच्या आधी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली.
खरं तर शोएब अख्तर आपल्या संपूर्ण कारकीर्दीत पीसीबीशी वाद करतानाच दिसला. या कारणास्तव, तो कारकिर्दीत त्याच्या क्षमतेनुसार अधिक सामने खेळू शकला नाही. बोर्डाशी झालेल्या वादामुळे त्याला कारकीर्दीच्या अखेरीस अंतिम अकरामधून सतत बाहेर ठेवण्यात आले.
ज्यामध्ये २०११ च्या विश्वचषकातील भारता विरुद्धच्या उपांत्य सामन्याचा समावेश आहे. इतकेच नाही तर अख्तरला आपल्या कारकीर्दीत वेगवेगळ्या कारणांमुळे पुन्हा पुन्हा बंदीचा सामना करावा लागला. यामुळे, शेवटी तो स्वतः अस्वस्थ झाला आणि वेळेआधीच क्रिकेटला निरोप दिला. त्याने विश्वचषक २०११ नंतर क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.
२. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
भारताच्या सर्व क्रिकेटप्रेमींना माजी भारतीय दिग्गज स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागची सवय माहित आहे. बोलताना सेहवागने कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्याने धोनीमुळे आपले करिअर संपल्याचे आरोप माध्यमांसमोर अनेक वेळा केला आहे.
वीरेंद्र सेहवाग आणि धोनी यांच्यातील चांगले संबंध नसल्याची चर्चा अनेकदा झाली आहे. खरं तर, २०१२ च्या शेवटी, जेव्हा धोनी आणि सेहवाग यांच्यातील संबंध बिनसल्याचे म्हटले गेले, तेव्हा सेहवागला त्याची किंमत मोजावी लागली. या वादामुळे सेहवागला संघातून वगळण्यात आल्याचेही म्हटले जाते.
सेहवागने दि.२० ऑक्टोबर २०१५ रोजी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.
१. गौतम गंभीर (Gautam Gambhir)
या यादीत भारतीय संघाचा धमाकेदार सलामीवीर गौतम गंभीर याचेही नाव आहे. त्याची कारकीर्दही अशाच पद्धतीने संपली. खरं तर पत्रकार परिषद आणि इतर मुलाखतीत गौतम गंभीरने कर्णधार धोनी आणि बोर्डाबद्दल बरीच वादग्रस्त विधाने केली आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, कर्णधार धोनी आणि गौतम गंभीर यांच्यात २०१२ मध्ये वाद सुरू झाला होता. त्यानंतर गंभीरने पत्रकार परिषदेत अशी अनेकदा अनेक वादग्रत विधाने केली त्यानंतर बोर्ड धोनीच्या बाजूने उभा राहिला आणि गौतम गंभीरला संघातून वगळले.
वादानंतर त्याला एक संधी दिली आणि संघात स्थान दिले. पण काही सामान्यांनंतर त्याला पुन्हा संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ज्यामुळे गौतम गंभीरला आपली कारकीर्द संपवावी लागली. त्याने दि. ०३ डिसेंबर २०१८ मध्ये क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. पण आजही अनेकदा धोनीवर टिका करताना दिसतो.
वाचनीय लेख –
जर आयपीएल झाली तर नेपाळसह या ८ देशांना होणार करोडोंचा फायदा, कारणही आहे खास
या ३ भारतीयांना वेळीच संधी मिळाली असती तर आज असते दिग्गज क्रिकेटपटू