भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातून अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात अभिषेकचे खातेही उघडले नाही. गोलंदाजीतही त्याला यश मिळाले नाही. खराब गेलेल्या पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच सामन्यात अभिषेकने शतक झळकावले. सलामीवीर अभिषेकने केवळ 46 चेंडूत आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो भारतीय संघाचा 10वा फलंदाज ठरला.
अभिषेक शर्मा हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. अंडर-19 क्रिकेटमध्ये तो अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत 5 आणि 6 व्या क्रमांकावर खेळत असे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यांमध्ये अभिषेकने गोलंदाजी केली आहे. मात्र चौथ्या सामन्यात त्याला पहिले यश मिळाले. अभिषेक शर्मानेच भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याच्या चेंडूवर तदिवनाशे मारुमणीने रिंकू सिंगच्या हाती झेल बाद झाला.
याच मालिकेत शतक आणि विकेट घेणारा अभिषेक शर्मा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. गिलच्या आधी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 9 फलंदाजांनी शतके झळकावली आहेत. यामध्ये सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि शुभमन गिल यांच्या नावाचा समावेश आहे. पण ज्या मालिकेत त्यांनी शतक झळकावले त्या मालिकेत त्यापैकी एकालाही विकेट घेता आली नाही.
टी20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. तर शेवटचा पाचवा सामना आज (14 जुलै) हरारे येथे होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी मालिकेत चमकादार कामगिरी केले आहे. या दाैऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्याकडे संघाचे पदभार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
कपिल देव यांचे प्रयत्न फळाला! कॅन्सरशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून तातडीनं मदतीची घोषणा
भर मैदानात युवराज सिंग रॉबिन उथप्पावर चिडला, सर्वांसमोर केला असं काही… व्हिडिओ आला समोर
रिकी पाँटिंगनंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक कोण बनेल? सौरव गांगुलीनं केला खुलासा