सुपर 4 मधील आपल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला 6 विकेटने हरवले आहे. आता भारतीय टीम दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये बांग्लादेशचा सामना करणार आहे (IND vs BAN). 24 सप्टेंबरला या सामन्यात दोन्ही संघ दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघ आक्रमक क्रिकेट खेळताना दिसतील. 24 सप्टेंबरला मैदानावर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात जुलैमध्ये वाइट-बॉल क्रिकेट मालिका होणार होती, पण बांग्लादेशच्या खराब परिस्थितीमुळे ती 1 वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. दोन्ही देशांमधील संबंध सध्या खूप चांगले नाहीत. त्यामुळे बांग्लादेशविरुद्ध मैदानावर दोन्ही संघ आक्रमक खेळताना दिसतील. भारतीय संघही मैदानावर बॅट आणि बॉल दोन्ही बाजूने उत्तर द्यायला तयार आहे. त्यामुळे पाकिस्तानसारखं बांग्लादेशविरुद्धही वातावरण चिडचिडीत होऊ शकतं.
आशिया कपमध्ये बांग्लादेशचं भारताविरुद्धचं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. त्यामुळे लिदन दासची टीम हा रेकॉर्ड सुधारण्यासाठी मैदानात उतरून खेळेल.
टीम इंडिया आणि बांग्लादेश यांच्यातील या सामन्यात जिंकणारी टीम पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर राहील आणि फायनलचा मार्ग त्याच्यासाठी सोपा होईल. तर पराभूत होणाऱ्या संघासाठी पुढील मार्ग अवघड होईल. त्यांच्या भवितव्याचा निर्णय या सामन्यावर ठरेल. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात हरलेली टीम या स्पर्धेमधून बाहेर जाईल.






