---Advertisement---

टीम इंडियानं बार्बाडोसहून ज्या विमानानं प्रवास केला, त्यानं बनवला मोठा विक्रम! जाणून घ्या

---Advertisement---

टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला बार्बाडोसहून भारतात आणण्यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. टीम भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री बार्बाडोसहून निघाली आणि गुरुवारी पहाटे राजधानी दिल्लीत दाखल झाली. आता भारतीय टीम ज्या फ्लाईटनं मायदेशी परतली तिनं एक नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे!

या फ्लाईटचं नाव ‘AIC24WC’ असं होतं. विमानांना लाईव्ह ट्रॅक करणाऱ्या रेडार 24 या कंपनीनं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, बार्बाडोसहून भारतात येणाऱ्या या फ्लाईटला सर्वात जास्त लोक ट्रॅक करत होते. भारतीय चाहत्यांना टीम इंडिया मायदेशी कधी परतते याची खूप उत्सुकता लागली होती. त्यामुळे चाहते सतत या फ्लाईटला ट्रॅक करत होते.

फ्लाईट रडार कंपनीनं सोशल मीडियावर सांगितलं, “सध्या भारतीय संघ ज्या फ्लाईटमध्ये आहे, त्या फ्लाईटला सर्वाधिक लोकं ट्रॅक करत आहेत. जेव्हा कंपनीनं डेटा शेअर केला, तेव्हा एकूण 5,252 लोकं एयर इंडियाच्या या चार्टर फ्लाईटला ट्रॅक करत होते. ही संख्या सातत्यानं वाढत होती.

 

भारतीय टीम गुरुवारी पहाटे दिल्ली विमानतळावर दाखल झाली. त्यानंतर सुमारे 12 वाजताच्या सुमारास संघानं पंतप्रधान नरेंद्री मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर संघ मुंबईसाठी रवाना झाला. मुंबईत सायंकाळी विजयी परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. ही विजय परेड नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी असेल. 2007 मध्ये जेव्हा भारतीय संघानं पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता, तेव्हा अशा परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. आता तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा अशी परेड पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

तुम्ही वानखेडेवर टीम इंडियाचा विजयोत्सव प्रत्यक्ष पाहू शकता का? पाहा काय आहे प्रोसेस
तो क्षण जेव्हा भारतीय संघ पहिल्यांदा विश्वविजेता ठरला होता, कपिल देव यांच्या नेतृत्वात केले होते विक्रम
मुंबईतील टीम इंडियाची विजयी परेड घरबसल्या लाईव्ह कशी पाहता येणार? जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---