रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतीच बांग्लादेशविरुद्धची पहिली कसोटी जिंकली. आता या मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून ग्रीन पार्क कानपूर येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपने रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठे वक्तव्य केला आहे. रोहित शर्मा कर्णधार कसा आहे हे त्याने सांगितले आहे.
आकाशदीपला चेन्नईत बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. जी त्याच्या कारकिर्दीतील दुसरी कसोटी होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय वेगवान गोलंदाजाने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कसोटी पदार्पण केले होते.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना आकाश दीप म्हणाला, “रोहित शर्मा हा सर्वोत्तम कर्णधार आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली मी खेळलो आहे. रोहित भैयाच्या नेतृत्वाखाली खेळणे मी स्वतःला भाग्यवान समजतो. तो वेगळ्या प्रकारचा कर्णधार आहे. याआधी मी त्याच्या हाताखाली खेळलो नाही. आतापर्यंत मी त्याच्यासारखा कर्णधार कधीही पाहिले नाही.”
बांग्लादेशविरुद्ध चेन्नईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत आकाशने 2 बळी घेतले. विशेष म्हणजे त्याने सलग दोन्ही विकेट घेतल्या. आकाशने पहिल्या डावात दोन्ही 2 विकेट घेतल्या होत्या. यापूर्वी आकाश इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला होता. आकाशने इंग्लंड मालिकेतील रांची कसोटीत पदार्पण केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतल्या आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये आकाश दीपने आतापर्यंत 33 प्रथम श्रेणी, 28 लिस्ट ए आणि 42 टी-20 सामने खेळले आहेत. 54 प्रथम श्रेणी डावांमध्ये त्याने 22.80 च्या सरासरीने 118 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने लिस्ट ए च्या 28 डावांमध्ये 24.50 च्या सरासरीने 42 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 च्या उर्वरित 42 डावांमध्ये त्याच्या नावावर 49 विकेट्स आहेत.
हेही वाचा-
ind vs ban; हे 4 मोठे विक्रम आर अश्विन दुसऱ्या सामन्यात आपल्या नावे करू शकतो
LLC 2024; गब्बरच्या संघाचा दारूण पराभव; दिनेश कार्तिकच्या सदर्न सुपर स्टार्सचा दबदबा
In the air…Sreesanth takes it.., जेव्हा टीम इंडिया पहिल्यांदा टी20 वर्ल्ड चॅम्पियन बनली होती!